शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

मानसिकदृष्ट्या दोन्ही संघ बरोबरीत

By admin | Published: March 21, 2017 1:05 AM

रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते.

रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. कारण, चौथा दिवस संपता संपता भारताने आॅस्ट्रेलियाचे दोन गडी बाद करुन, त्यांच्यावर थोडे दडपण आणले होते. त्यात सकाळी पहिल्या सत्रात भारतासाठी या मालिकेत सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलेला स्टिव्ह स्मिथ आणि सलामीवीर रेनशॉ हे दोघेही लवकर बाद झाले, त्यामुळे भारतीय गोलंदाज आज जलवा दाखवणार असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. शॉन मार्श आणि पीटर हॅँड्सकोंब यांच्यात झालेल्या जबरदस्त भागीदारीमुळे भारताला विजयापासून वंचित राहावे लागले. हँड्सकोब, रेनशॉ, कमिन्स यासारखे युवा खेळाडू हे भारत दौऱ्यातून आॅस्ट्रेलियाला मिळालेली देणगी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करुन ते संघात आपले स्थान पक्के करीत आहेत. आॅस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत ठेवून मोठे यश तर मिळवले आहेच, शिवाय बंगलोर कसोटीतील विजयामुळे भारताला जी मानसिक आघाडी मिळाली होती, ती आता बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघ जेव्हा धरमशाला येथे जातील तेव्हा दोघेही समान पातळीवर असतील.कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे भारतीय चमू निराश झाला असला, तरी या सामन्यातून भारताला बरेच काही गवसले आहे. चेतेश्वर पुजारा हा खेळाडू किती महान आहे, याची प्रचिती या सामन्यातून आली. दबावाच्या वेळी तो मैदानात तंबू ठोकून उभा राहिला नसता, तर आॅस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली असती, अशी परिस्थिती होती. परंतु, त्याने आपल्या फलंदाजीने आॅस्ट्रेलियाची धावसंख्या मागे टाकून भारताला दीडशेच्यावर आघाडी मिळवून दिली. यावरुन तो किती मोठा खेळाडू आहे त्याची कल्पना येते. याशिवाय वृद्धिमान साहा हा सुध्दा या मालिकेतून भरवशाचा फलंदाज म्हणून उदयास येत आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या मोठ्या खेळाडूची जागा त्याला भरुन काढायची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण, संपूर्ण हंगामात त्याने चांगली कामगिरी करुन धोनीची उणीव जाणवणार नाही याची काळजी घेतली आहे. रवींद्र जडेजाने आपली अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप आणखी पक्की केली आहे. या खेळपट्टीवर ९ बळी घेणे कठीण कामगिरी आहे. परंतु, गोलंदाजीतील सातत्य त्याने दाखवून दिले आहे. त्याचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होत असते, फलंदाजीत तो परिस्थितीनुसार गिअरअप करतो. त्याचे चौथ्या दिवसाचे जलद अर्धशतक भारतासाठी महत्त्वपूर्ण होते. तो अष्टपैलू म्हणून प्रगल्भ होत आहे, हे मात्र निश्चित. रविचंद्रन आश्विनला या मालिकेत जास्त बळी मिळवता आले नसले तरी गेल्या दोन हंगामात त्याने केलेली कामगिरी विसरुन चालणार नाही. त्याला लगेच दोषी ठरवून चालणार नाही, पुढे धरमशालामध्ये काय होतंय ते पाहुया.