शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

क्रिकेटच्या प्रश्नावर मोदींचे स्मित

By admin | Published: December 13, 2015 2:38 AM

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर, उभय संघांदरम्यान मालिकेचा निर्णय खेळाडू नाही तर सरकार घेईल, असे मत विश्वकप विजेते भारतीय कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. दोन्ही दिग्गज अष्टपैलू कपिल व इम्रान एका वृत्तवाहिनीतर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इम्रान यांनी सांगितले, ‘‘उभय देशांदरम्यान क्रिकेट होणे आवश्यक आहे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उभय देशांदरम्यान क्रिकेट व्हायला पाहिजे, असे म्हटले, त्या वेळी मोदी यांनी केवळ स्मित केले. त्यांचा होकार होता की नकार, हे मला कळाले नाही. मी सकारात्मक विचार करणारा असल्यामुळे मी होकारच समजतो.’’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यात मालिका प्रस्तावित आहे. त्यासाठी उभय देशांच्या बोर्डांची सहमती आहे; पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या मालिकेसाठी अद्याप सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलीकडचे स्पष्ट केले, की मालिकेच्या आयोजनासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आम्हाला अद्याप सरकारकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तान तहरिके इन्साफ पार्टीचे अध्यक्ष असलेले इम्रान म्हणाले, ‘‘ज्या वेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी पाकिस्तानच्या नागरिकांनाही दु:ख झाले. काही लोकांच्या कृत्यामुळे कुणी पूर्ण देशाची मानसिकता ठरवू शकत नाही. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. क्रिकेट खेळणे बंद करणे यावरचा उपाय नाही. आमची संस्कृती एक आहे.’’इम्रान पुढे म्हणाले, ‘‘मी काही मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला नसून काही करण्यासाठी त्याचा स्वीकार केला आहे. मी पंतप्रधान होण्यास इच्छुक नसून लोकांची सेवा करण्यास प्रयत्नशील आहे.’’(वृत्तसंस्था) खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत; पण देशाच्या निर्णयाविरुद्ध जाणार नाहीत. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. क्रिकेट मालिकेबाबतचा निर्णय देशाचे सरकार घेईल, खेळाडू नाही.- कपिलदेव, माजी कर्णधार, भारतआमचा मैत्रीपूर्ण वातावरणात खेळण्याचा प्रयत्न असायचा; पण चाहत्यांची गर्दी बघितल्यानंतर आमच्यावर दडपण येत होते. पराभव स्वीकारावा लागला, तरी कठीण होत असे. एक वेळ कोलकात्यामध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, त्या वेळी कुणी जागे राहणार नाही, याची खबरदारी घेत पाकिस्तानमध्ये दाखल झालो होतो.- इम्रान खान