शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मुंबईकरांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:25 IST

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे, ठाण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत आपली चमक दाखवली.चिपळून येथे महाराष्ट्र खो - खो संघटनेच्या मान्यतेने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या कुमार गटात मुंबईने जळगावचा २१-९ असा एक डाव व १२ गुणांनी फडशा पाडला. पहिल्याच डावात मुंबईने २१-४ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर जळगावने पुनरागमन करण्याचे प्रयत्नही केले नाहीत. दुसºया डावातही मुंबईच्या मुलांनी ५-० असे वर्चस्व राखत दणदणीत बाजी मारली. शुभम शिगवण, जितेश नेवाळकर यांचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला. आयुष गुरव आणि सनी तांबे यांनीही जबरदस्त आक्रमण करताना जळगावची दाणादाण उडवली. अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या कुमार संघाने कसलेल्या रत्नागिरीचे आव्हान १६-९ असे ७ गुणांनी परतावले. कर्णधार निहार दुबळे, सिध्देश थोरात आणि अक्षय कदम यांनी उपनगरचा विजय साकारला.मुलींच्या गटात मुंबईने सहज विजयी आगेकूच करताना धुळ्याचा २४-८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. मध्यंतराला मुंबईकरांनी २४-३ अशी भलीमोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. यानंतरही मुंबईकरांनी आपली पकड अधिक घट्ट करत धुळ्याची आव्हान संपुष्टात आणले. वैष्णवी परब, सायली म्हैसधुणे आणि शिवानी गुप्ता यांच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. त्याचवेळी, रत्नागिरीने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य मुंबई उपनगरला १७-१३ असा ४ गुणांनी धक्का दिला. पहिलेदोन्ही डाव अनुक्रमे ४-४, ६-६ असे बरोबरीत राहिल्यानंतर तिसºयाडावात रत्नागिरीने ७-३ अशी बाजी मारली. अपेक्षा सुतारने अप्रतिम अष्टपैलू खेळ करत रत्नागिरीचा एकाहाती विजय साकारला. उपनगरच्या आरती कदमची झुंजार खेळी अपयशी ठरली.।ठाण्याचे दुहेरी कूच...कुमार गटामध्ये ठाणे संघाने उस्मानाबादचे आव्हान १३-१० असे ३ गुणांनी परतावून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात एकतर्फी आघाडी घेत ठाणेकरांनी सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मुलींच्या गटातही ठाण्याने दणदणीत विजय मिळवताना औरंगाबादचा १०-५ असा एक डाव आणि ५ गुण राखून फडशा पाडला. रेश्मा राठोड, गितांजली नरसाळे आणि वृत्तिका सोनावणै यांनी ठाण्याच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले.