शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

विजयासाठी ३३० धावांची गरज - धोनी

By admin | Published: January 15, 2016 7:49 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलगच्या दोन पराभवानंतर धोनीने पराभवाचे खापर गोलंदाजावर फोडले आहे. ‘गोलंदाजीचा दर्जा पाहता आता किमान 330 धावा कराव्या लागतील

ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. १५ - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलगच्या दोन पराभवानंतर धोनीने पराभवाचे खापर गोलंदाजावर फोडले आहे. ‘गोलंदाजीचा दर्जा पाहता आता किमान ३३० धावा कराव्या लागतील‘ असे हताश वक्तव्य कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज दुसऱ्या सामन्यानंतर मध्यमांशी बोलताना केले. 
 
 सध्याच्या स्थितीत आमच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, फलंदाजांनी आणखी मेहनत घेऊन प्रतिस्पर्धी संघासमोर सुमारे ३३० धावांचे आव्हान ठेवले पाहिजे', असे मत कर्णधार महेंद्रसिग धोनीने या पराभवाचे विश्लेषण करताना मांडले. ' आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात शेवटी तुमचा परफॉर्मन्स महत्वाचा ठरतो. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खरच उत्तम कामगिरी केली' असेही धोनी म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात तीनशेहून अधिक धावा केल्यानंतरही दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीने हे मत व्यक्त केले. 
 
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचे 309 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार करत पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामाना जिंकून मालिकेतील आव्हान जिंवत ठेवायचं असेल तर फलंदाजाला ३३० पेक्षा अधिक धावा बनवणं गरजेचं असल्याचं मत भारतीय कर्णधार ढोणी यानी व्यक्त केले आहे. 
 
भारताकडून पहिल्या दोन्ही सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा व दोन्ही डावात अर्धसतक करणाऱ्या उपकर्णधार कोहलीच कौतूक करायला धोनी विसरला नाही. चेंडू जुना झाल्यानंतरही आम्ही यष्टींच्या दोन्ही बाजूंना ‘वाईड‘ चेंडू टाकले. फलंदाजांवर दडपण आणण्याची गरज असताना आम्ही ‘वाईड‘ चेंडू टाकले. त्या तुलनेत फिरकी गोलंदाजांनी चांगला मारा केला,‘‘ असे धोनी म्हणाला.