शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

नेमबाजांचे तंत्र सुधारण्याची गरज -कोच मिखाईलोव्ह

By admin | Published: February 23, 2017 1:00 AM

भारतीय नेमबाजांनी अलीकडे उत्कृष्ट कामगिरी केली नसली, तरी नवनियुक्त कोच युक्रेनचे ओलेग मिखाईलोव्ह यांच्या

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी अलीकडे उत्कृष्ट कामगिरी केली नसली, तरी नवनियुक्त कोच युक्रेनचे ओलेग मिखाईलोव्ह यांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांमध्ये भारतीय खेळाडू सरस आहेत. केवळ त्यांचे तंत्र सुधारण्याची गरज आहे.रिओ आॅलिम्पिकदरम्यान मिखाईलोव्ह यांनी ब्राझीलच्या पिस्तूल संघाला कोचिंग दिले. सध्या त्यांनी संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंत यांना दहा दिवस मार्गदर्शन केले. इतका कमी वेळ कोचिंगसाठी उपयुक्त नसला तरी मी रोमांचित झालो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.मिखाईलोव्ह पुढे म्हणाले, ‘मी येथे दहा दिवसांपासून आहे. भारतीय संघ फार बलाढ्य आहे इतकेच सांगू शकतो. या संघात दिग्गज नेमबाज आहेत. केवळ या खेळाडूंचे तंत्र सुधारण्याची गरज आहे. मला येथे शून्यापासून सुरुवात करण्याची गरज नाही. हे खेळाडू जगात सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील इतकेच मी आश्वस्त करू इच्छितो.’ डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंजवर विश्वचषकाच्या तयारीत भारतीय संघ व्यस्त आहे. या संघाला मिखाईलोव्ह मार्गदर्शन करीत असताना खेळाडू त्यांचा सल्ला ऐकण्यात तल्लीन होते. भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. घरच्या प्रेक्षकांपुढे नेमबाजांवर अधिक दबाव असेल, असे नव्या कोचचे मत आहे. ते पुढे म्हणाले, ‘मायदेशात नेमबाजांवर स्थानिक चाहत्यांचा दबाव असतो. त्यामुळे कामगिरी खालावण्याची देखील भीती असते.’विश्वचषकाचे भारतात आयोजन पहिल्यांदा होत असल्याने अनुभवाची उणीव आहे. रेंज सज्ज नसल्यामुळे नेमबाजांना सरावाची पुरेशी संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. भविष्यातील स्पर्धांची तयारी फार पूर्वी व्हायला हवी, असे मिखाईल यांचे मत होते. (वृत्तसंस्था)