शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

टर्निंग विकेटवर फलंदाजांनी संयम राखण्याची गरज : शास्त्री

By admin | Published: December 13, 2015 2:30 AM

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.शास्त्री यांनी बीसीसीआयच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीचे नेतृत्व आणि अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांच्या फलंदाजीची प्रशंसा केली. शास्त्री म्हणाले, ‘भारतीय संघासाठी अडचण ही आहे, की आमचे खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळत नाही आणि यात त्यांची चूक नाही. भारतीय संघाचा कार्यक्रम व्यस्त आहे. त्यामुळे फूटवर्क आणि टर्निंग खेळपट्ट्यांवर फूटवर्कमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. टर्निंग खेळपट्ट्यांवर उणिवा स्पष्ट होतात.’शास्त्री पुढे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ विदेशात खेळला. ज्यावेळी मायदेशात खेळावे लागले त्यावेळी परिस्थिती बदललेली होती.’शास्त्री यांनी रहाणेची प्रशंसा केली. रहाणेने पहिल्या दोन कसोटी सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या लढतीत शानदार पुनरागमन केले. पहिल्या लढतीत तो बचावात्मक फटका खेळताना तर दुसऱ्यांदा तो आक्रमक फटका खेळताना बाद झाला. दिल्ली कसोटीत मात्र त्याने कामगिरीत सुधारणा केली.’ विराट कोहलीच्या नेतृत्वाची शास्त्री यांनी प्रशंसा करताना म्हटले, की ‘९ डिसेंबर २०१४ रोजी कोहलीने प्रथमच अ‍ॅडिलेडमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. वर्षभरानंतर तो जिगरबाज संघाचे नेतृत्व करीत आहे, असे वक्तव्य करू शकतो. विराट प्रत्येक ठिकाणी असतो आणि प्रत्येकासोबत संवाद साधतो. कर्णधारामध्ये ही कला असणे आवश्यक असते. (वृत्तसंस्था)