शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

नव्या खेळांडूजवळ आत्मविश्वास आहे, तेवढा आमच्याकडे नव्हता - विराट कोहली

By admin | Published: March 14, 2016 6:42 PM

पांड्या, बुमराह, नेगी यांच्याकडे खुप आत्मविश्वास आहे, इतका आत्मविश्वास जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेंव्हा आमच्याकडेदेखील नव्हता असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - पांड्या, बुमराह, नेगी यांच्याकडे खुप आत्मविश्वास आहे, इतका आत्मविश्वास जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेंव्हा आमच्याकडेदेखील नव्हता असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे. उद्यापासून टी२० विश्वचषकाच्या रणसंग्रामास सुरवात गोत आहे, त्या धरतीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत तो बोलत होता. टी२० मधील भारताचा उद्या सलामीचा न्यूझीलंड दरम्यान होणार आहे.
 
प्रत्येकजण चांगला खेळत आहे, आणि प्रत्येकाला विजयात योगदान द्यायच आहे ही संघासाठी चांगली गोष्ट आहे. गेल्या ११ टी २० सामन्यापैकी भारताने १० सामने जिंकले आहेत. भारताने सलग ७ टी२० सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आशिया चषक स्पर्धेत लगोपाठ विजय मिळविले आहे. विजयाची हीच मालिका टी-२० विश्चषकातही कायम राखू, असा असा विश्वास भारतीय संघाचा उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
 
बलाढ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात व्हाईट वॉश देण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतीय संघाने केली आहे. त्यानंतर मायदेशात श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका व नुकत्याच संपलेल्या आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने सर्व क्षेत्रात खेळ उंचावत विजेतेपद पटकावले. सलग तीन मलिका विजयामुळे टीम इंडियाला आत्मविश्वास दुणावला आहे त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडियाचे तगडे आव्हान असणार आहे. 
 
यजमान असल्यामुळे टीम इंडियाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्याचे आपल्याला कोणतचे दडपण नसल्याचेही त्यांने सांगितले. विराटने बुमराह आणि हार्दीक पांड्याच्या कामगिरीची स्तुती केली. विश्चषकात भारताचे हे युवा खेळाडू नक्कीच आपली छाप सोडतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. मोहम्मद शमीच्या खेळण्याबाबत कर्णधार आणि संघ व्यवस्थापण निर्णय घेईल, असेही विराटने सांगितले.