शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

न्यूझीलंड-मुंबई सराव सामना आजपासून

By admin | Published: September 15, 2016 11:34 PM

न्यूझीलंडसाठी भारत दौरा आव्हानात्मक ठरणार आहे. कारण वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीवर आज, शुक्रवारपासून मुंबईविरुद्ध खेळल्या

नवी दिल्ली : न्यूझीलंडसाठी भारत दौरा आव्हानात्मक ठरणार आहे. कारण वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीवर आज, शुक्रवारपासून मुंबईविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव सराव सामन्यात त्यांच्या फलंदाजांना फिरकीविरुद्ध खेळण्याची अधिक संधी मिळणार नाही. खेळपट्टीचे स्वरूप बघितल्यानंतर तीन दिवसीय सराव सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना सिनिअर खेळाडू रॉस टेलर म्हणाला,‘कोटलाच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक वळणार नसल्याचे संकेत मिळत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मात्र अशी परिस्थिती राहणार नाही, हे नक्की.’कोटलाच्या खेळपट्टीवर थोडी हिरवळ आहे. टेलरने कोटलाच्या खेळपट्टीचा उल्लेख करताना म्हटले की,‘कसोटी क्रिकेट कसे खेळल्या जाते त्याचा हा एक भाग आहे. तुम्ही न्यूझीलंडमध्ये आले असते तर यापेक्षा वेगळे नसते. आमच्या येथील खेळपट्टीवर थोडी हिरवळ असते. मायदेशात खेळण्याचा लाभ मिळत असतो. आम्हाला खेळपट्टी फिरकीला अनुकूल असण्याची आशा आहे. कसोटी मालिकेत कोटलाच्या खेळपट्टीप्रमाणे खेळपट्ट्या मिळणार नाहीत, हे नक्की.’ भारतात २०१२ मध्ये एकमेव कसोटी शतक झळकावणारा टेलर पुढे म्हणाला,‘विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान आम्ही दिल्लीत खेळलेल्या सामन्यातील खेळपट्टीवर अन्य स्थळांच्या तुलनेत अधिक हिरवळ होती. सराव सामना सराव सामना असतो. या लढतीच्या निमित्ताने भारतीय वातावरणासोबत जुळवून घेण्याची संधी मिळते. न्यूझीलंडच्या तुलनेत येथे अधिक उष्णता आहे. त्यामुळे सराव करणे चांगले आहे. मुंबईविरुद्धचा सराव सामना खडतर होण्याची आशा आहे.’रणजी चॅम्पियन मुंबई संघाला कसोटी संघाविरुद्ध खेळून मोसमाची चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. अखिल हेरवादकर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व धवल कुलकर्णी आॅस्ट्रेलियात भारत ‘अ’ संघासोबत आहेत. मुंबई संघाला त्यांची उणिव भासणार आहे, पण त्यामुळे त्यांना राखीव खेळाडूंची क्षमता तपासण्याची संधी मिळणार आहे. रोहित शर्मा दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत सहभागी झाला होता. तो या लढतीत खेळणार आहे. कर्णधार आदित्य तारेने न्यूझीलंड संघापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. मुंबई संघाने यापूर्वीही दौऱ्यावर येणाऱ्या संघाला अडचणीत आणले आहे.मालिकेचा निकाल फिरकीपटूंवर अवलंबून : गंभीरनवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या आगामी तीन कसोटी सामन्यांचा निकाल फिरकीपटूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. मालिकेतील पहिली लढत २२ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळल्या जाणार आहे. यजमान संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक करू नये. उभय संघांत दर्जेदार फिरीकपटूंचा समावेश असून मालिकेचा निकाल फिरकीपटू निश्चित करतील, असेही गंभीर म्हणाला.न्यूझीलंड संघ तुल्यबळ आहे. त्यांच्या संघात तीन फिरकीपटूंचा (मिशेल सँटनर, ईश सोढी आणि मार्क क्रेग) समावेश आहे. ज्या संघाचे फिरकीपटू चांगली कामगिरी करतील तो संघ मालिकेत बाजी मारेल.असेही गंभीरने यावेळी सांगितले.