शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

...त्या रात्री झोप उडाली होती : मनदीप

By admin | Published: June 21, 2016 7:16 PM

दडपणामुळे मला त्या रात्री झोपच लागली नाही आणि मैदानात पाय ठेवल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले

ऑनलाइन लोकमत

हरारे, दि. 21 - दडपणामुळे मला त्या रात्री झोपच लागली नाही आणि मैदानात पाय ठेवल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या टी-२० लढतीत नाबाद अर्धशतकी खेळीत भारताला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवा फलंदाज मनदीप सिंगने व्यक्त केली. सोमवारच्या लढतीत १०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मनदीपने नाबाद ५२ धावांची खेळी केली. फलंदाजीसाठी मैदानात पाय ठेवल्यानंतर दडपण कमी झाले, असे त्याने सांगितले. सामन्यानंतर बोलताना मनदीप म्हणाला, सामन्याच्या पूर्वीच्या रात्री मला झोप आली नाही. मालिका जिंकण्याचे विचार मनात घोळत होते. त्याचप्रमाणे निवड समितीचे आपल्यावर लक्ष आहे, हे तथ्यही नाकारता येत नाही. याला तुम्ही दडपण म्हणून शकता किंवा निराशा म्हणता येईल, पण फलंदाजीला गेल्यानंतर सर्व काही सुरळीत होते. किमान माझ्याबाबतीत हे लागू होते. त्यावेळी लक्ष्य केवळ १०० धावांचे असून ते कसे गाठता येईल, याचाच विचार होता. मैदानावर उतरल्यानंतर निवड समिती सदस्य मला बघत आहेत, याचा विचार मी करीत नाही. मालिका महत्त्वाची असल्यामुळे सामन्यापूर्वी अशा बाबी मनात घोळत असतात, पण मैदानात दाखल झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत होते.मनदीप पुढे म्हणाला, पहिल्या टी-२० मध्ये धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निकालापेक्षा केवळ कामगिरीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधता आली. निकालावर अधिक विचार करण्यापेक्षा कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. मालिका विजय मिळवण्यास उत्सुक असतो, पण नेहमी त्याचाच विचार केला तर दडपण येते.