शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पाकिस्तान बरोबर फायनलसाठी कुठल्याही बदलाची गरज नाही - विराट कोहली

By admin | Published: June 16, 2017 11:56 AM

पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणा-या अंतिम फेरीच्या सामन्यात संघात फारसे बदल करणार नसल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 16 -  पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणा-या अंतिम फेरीच्या सामन्यात संघात फारसे बदल करणार नसल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. संपूर्ण स्पर्धेत आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतोय अंतिम फेरीतही तसाच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तानची बलस्थाने आणि कमकुवतपणा ठाऊक आहे. त्यामुळे त्यानुसार रणनीती आखून खेळण्याचा प्रयत्न असेल. 
 
सध्या आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतोय त्यापेक्षा वेगळे काही करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही असे विराट म्हणाला. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेऊन त्यादिवशी चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल असे विराटने सांगितले. पाकिस्तानला काय संदेश देणार या प्रश्नावर कोहलीने थेट उत्तर टाळले. 
 
असा कुठलाही संदेश देण्याची गरज नाही. तुम्ही फायनल खेळण्यासाठी मानसिक दृष्टया तयार नसाल तर, तुम्ही 100 टक्के फिट आहात किंवा तुम्ही मोठा विजय मिळवून इथवर पोहोचलात याला अर्थ उरत नाही असे कोहली म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी तुम्ही कुठला अंदाज बांधू नका. या स्पर्धेत अनेक आश्चचर्यकारक निकाल पाहायला मिळालेत. आम्ही फायनलमध्ये खेळण्याचा आनंद घेणार आहोत असे कोहली म्हणाला. 
 
आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. आम्ही कुठलीही गोष्ट गृहित धरणार नाही. आम्ही नऊ विकेटने जिंकलो किंवा एक विकेटने फरक पडत नाही. आम्ही मैदानावर उतरल्यानंतर पुन्हा तसेच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करु असे कोहली म्हणाला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानी संघाचेही कोहलीने कौतुक केले. पाकिस्तानी संघाने मला प्रभावित केलेय. ते उत्तम क्रिकेट खेळले आहेत असे कोहली म्हणाला.      
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली.
 
तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.