शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

...अद्याप त्याचा विचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2016 12:47 AM

गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्याला बराच कालावधी लागणार आहे; पण कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राखण्यासाठी भविष्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचे आयोजन

नवी दिल्ली : गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्याला बराच कालावधी लागणार आहे; पण कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राखण्यासाठी भविष्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचे आयोजन होणे आवश्यक आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. भारतीय फिरकीपटू गुलाबी कुकाबुरा चेंडूने उपखंडातील खेळपट्ट्यांवर कशी कामगिरी करतील, याबाबत बोलताना कुंबळे म्हणाले, ‘‘सध्या आमचे लक्ष विंडीजमध्ये ‘लाल ड्युक्स’ चेंडूवर चांगली कामगिरी कशी करायची, यावर केंद्रित झाले आहे. आम्ही अद्याप गुलाबी चेंडूच्या कसोटीचा विचार केलेला नाही. गुलाबी चेंडूने कसोटी खेळण्यासाठी अद्याप बराच कालावधी शिल्लक आहे. आम्ही विंडीजमध्ये ड्यूक्सच्या लाल चेंडूने खेळणार आहोत. मी एका वेळी एकाच लढतीबाबत विचार करतो. आमच्यासाठी विंडीज दौरा महत्त्वाचा आहे. आम्ही गेल्या सहा दिवसांपासून लाल ड्यूक्स चेंडूने सराव केला. ज्या वेळी गुलाबी चेंडूने खेळायचे असेल त्या वेळी त्यावर लक्ष केंद्रित करू.’’भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आणि आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष असलेल्या कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राखण्यासाठी दिवस-रात्र कसोटीचे समर्थन केले. कुंबळे यांनी विराट कोहली शानदार फलंदाज असल्याचे म्हटले. विराटसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये त्याला अंडर-१९ पासून बघितले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तो परिपक्व क्रिकेटपटू झाला आहे. तो शानदार फलंदाज व कर्णधार आहे. तो आक्रमक असून मीसुद्धा आक्रमक आहे, असेही कुंबळे म्हणाले. विंडीजमधील खेळपट्ट्यांवर रवींद्र जडेजाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, अशी आशा असल्याचे कुंबळे यांनी या वेळी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)