शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

आता उत्सुकता प्लेआॅफची

By admin | Published: May 16, 2017 1:33 AM

आता आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. नंबर वन मुंबई इंडियन्स विरुद्ध नंबर टू रायझिंग पुणे सुपरजायंट आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स - सनरायझर्स हैदराबाद

अयाझ मेमन संपादकीय सल्लागारआता आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. नंबर वन मुंबई इंडियन्स विरुद्ध नंबर टू रायझिंग पुणे सुपरजायंट आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स - सनरायझर्स हैदराबाद या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये एलिमिनेटर लढत होईल. मुंबई आणि पुणे संघांना एक अतिरिक्त संधी मिळेल अंतिम फेरी गाठण्याची. या सामन्यातील पराभूत संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरी गाठण्याच्या उद्देशाने खेळेल. तर, क्वालिफायर १ मधील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. एकूणच ही पद्धत मला वाटते खूप चांगली आहे. कारण ज्या प्रकारे मुंबई आणि कोलकाता यांनी सुरुवात केली होती, ते पाहता दोन्ही संघ सहजपणे प्ले आॅफमध्ये प्रवेश करतील. परंतु, कोलकाता अव्वल दोन स्थानांमध्ये नसेल याची अजिबात कल्पना नव्हती. अखेरच्या ३-४ सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी काही प्रमाणात चांगली झाली नाही. अशा परिस्थितीमध्ये हैदराबादला वर येण्याची संधी मिळाली, तसेच खास करून पुण्याला जबरदस्त संधी मिळाली. पुण्याने मिळालेल्या संधीचे सोने करताना अव्वल दोन स्थानांमध्ये जागा मिळवली. हैदराबाद - कोलकाता सामना दोन्ही संघांसाठी परीक्षा ठरेल. कारण हा सामना बंगळुरूमध्ये होणार आहे. त्याउलट क्वालिफायर १ चा सामना मुंबईसाठी काहीसा फायदेशीर ठरणार आहे, जो त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर होणार आहे. पण माझ्या मते अशा निर्णायक क्षणी घरच्या मैदानाचा फायदा वगैरे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या नसतात. कोणत्या संघामध्ये गुणवत्ता आहे, जिंकण्याची जिद्द किती आहे हे येथे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे क्वालिफायर १ चा सामना कसा रंगतो याचीच उत्सुकता सध्या रंगली आहे. यंदाच्या सत्रात सर्वांत जास्त कोणत्या संघाने निराश केले असेल, तर ते रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. गतवर्षी या संघाने उपविजेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी या संघाने शानदार प्रदर्शन केले होते. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन यांनी वर्चस्व राखले होते. हा संघ एक प्रकारे चमत्कारिक होता. कोणताही सामना असो आणि कोणतीही परिस्थिती असो धावा सहजपणे निघत होत्या. तसेच, मिशेल स्टार्क, यजुवेंद्र चहल यांनीही मोलाचे योगदान दिले होते. पण या वर्षी बँगलोर संघाचा एकही स्टार यशस्वी ठरला नाही. अनेक सामन्यांत तर गेलसारख्या विध्वंसक फलंदाजाला राखीव ठेवण्यात आले होते. यावरून खूप काही शिकण्यासारखेही आहे. अनेक मोठे दिग्गज खेळाडू संघात असतील; मात्र ते एकत्रितपणे चमक दाखवत नसतील, संघाला कोणतीही दिशा नसेल, तर मग त्या संघाची वाईट स्थिती होते. काही प्रमाणात हीच अवस्था गुजरात लायन्सचीही झाली आहे. त्यांचा संघ समतोल नव्हता. गुजरातची फलंदाजी जबरदस्त मजबूत होती; मात्र गोलंदाजी खूप कमजोर होती. तसेच गोलंदाजीत फॉल्कनर आणि जडेजा अपयशी ठरले तर नुकसान जास्त होणार होते आणि तसेच झाले. त्यांच्यासाठीही निराशाजनक सांगता झाली. तसेच दिल्लीबाबत सांगायचे झाल्यास, त्यांची फलंदाजी खूप गुणवान होती. परंतु, कामगिरीत सातत्य नव्हते. सर्व युवा भारतीय होते. गोलंदाजीही चांगली होती. पण ज्या सातत्याची आवश्यकता होती ती दिसून आली नाही. हा संघ जेव्हा चांगला खेळला तेव्हा जबरदस्त होता आणि जेव्हा वाईट खेळला तेव्हा अत्यंत वाईट होता. किंग्ज इलेव्हन पंजाबचीही वेगळी गोष्ट नाही. अखेरच्या सामन्यात ज्या प्रकारे त्यांनी सामना गमावला ते आश्चर्यकारक होते. या सामन्याआधी मुंबईविरुद्ध २३० धावांचा एव्हरेस्ट उभारलेला हा संघ पुण्याविरुद्ध ७३ धावांत गडगडला. माझ्या मते यावर वीरेंद्र सेहवागने दिलेली प्रतिक्रिया खूप योग्य आहे की, ‘जे कोणी विदेशी स्टार येथे आले होते ते परिस्थिती किंवा खेळपट्टीला दोष देऊ शकत नाही.’ मुळात हेच मोठे आव्हान असते, जर तुम्ही याच दोन गोष्टींना घाबरत असाल, तर मोठे स्टार असून फायदा काय?