शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

भारताला कमबॅक करण्याची हीच संधी

By admin | Published: March 04, 2017 12:18 AM

पुण्यातील सामना तीन दिवसांत गमावल्यानंतर बंगलोर कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल.

- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारपुण्यातील सामना तीन दिवसांत गमावल्यानंतर बंगलोर कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल. मी फलंदाजांसाठी अशासाठी म्हणतोय, कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. असे असताना ज्याप्रकारे भारताची फलंदाजी पहिल्या सामन्यात कोसळली, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. बलाढ्य फलंदाजी मानल्या जाणाऱ्या भारताला अचानक झाले काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. विराट कोहली, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे सारेच अपयशी ठरले. केवळ के. एल. राहुलने त्या खेळपट्टीवर अर्धशतक ठोकले. त्यावेळी, थोडीफार आशा वाटलेली की भारतीय फलंदाज आॅसी फिरकीविरुध्द काहीतरी चांगली कामगिरी करतील. पण, सर्वांच्याच पदरी निराशा आली. आता, दुसऱ्या कसोटीत हा सामना अधिकाधिक दिवसापर्यंत खेचण्याचा प्रयत्न भारतीयांनी करायला हवा. आॅस्टे्रलियाकडेही चांगले गोलंदाज आहेत, जे फिरकी खेळपट्टीवर चित्र बदलू शकतात आणि हे आपण पुणे कसोटीमध्ये पाहिले आहे. तेव्हा असे अजिबात नाही, की फिरकी खेळपट्टीवर केवळ भारतीय गोलंदाजंच पाहुण्या संघावर वर्चस्व गाजवू शकतात. जर फिरकी खेळपट्टी असेल, तर भारतीय फलंदाजीही कमजोर होते हे सिध्द झाले आहे. आता, पहिला सामना मोठ्या अंतराने गमावला असून भारतीय संघ बॅकफूटवर आहे हे नक्की. पण माझ्यामते, अजूनही भारतीय संघाने मालिका गमावलेली नाही. पण मी असेही सांगू इच्छितो की, बंगलोर कसोटी अनिर्णित राहिल्यास किंवा आॅस्टे्रलियाने जिंकल्यास भारतीय संघावर ही मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच, भारतीय संघाला कमबॅक करण्याची हीच संधी आहे, या सर्व गोष्टी ध्यानात ठेवूनच टीम इंडियाला बंगलोरच्या मैदानावर उतरावे लागेल.