शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानची सरशी

By admin | Published: March 11, 2016 4:56 PM

ईडन गार्डनवर पाकिस्तानने ५ सामने जिंकले असून भारताला केवळ १ विजय मिळवता आला तर ५ सामने अनिर्णीत राहिले.

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ११ - वर्ल्डकपच्या सर्व प्रकारांमध्ये भारताची पाकिस्तान विरोधातील आतापर्यंतची कामगिरी अजिंक्य असली तरी, ईडन गार्डनची आकडेवारी मात्र पाकिस्तानच्या बाजूने जाणारी आहे. वनडे आणि कसोटीमध्ये मिळून भारत पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर आतापर्यंत ११ सामने झाले. त्यापैकी भारताने फक्ते १ सामना जिंकला असून, ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत तर  अन्य ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. 
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये १ ऑक्टोंबर १९७८ रोजी क्वेटाच्या अयुब नॅशनल स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना झाला. ४ धावांनी भारताने हा सामना जिंकला होता. ४० षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने १७० धावा केल्या. पाकिस्तानला १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. ५१ धावा करुन ३८ धावात दोन विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले होते. 
 
१८ फेब्रुवारी १९८७ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर पहिला सामना झाला. अटीतटीचा झालेला हा सामना पाकिस्तानने तीन चेंडू आणि दोन गडी राखून जिंकला होता. भारताने विजयासाठी दिलेले २३९ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने ३९.३ षटकात पार केले होते. नाबाद ७२ धावांची खेळी करणा-या सलीम मलिकला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या सामन्यात भारताचा सलामीवीर कृष्मचारी श्रीकांतने १२३ धावांची शतकी खेळी केली होती. 
 
२८ ऑक्टोंबर १९८९ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर दुसरा एकदिवसीय सामना झाला.  हा सामना पाकिस्तानने ७७ धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने ५० षटकात २७९ धावा केल्या. भारताचा डाव २०२ धावात आटोपला. नाबाद ४७ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा कर्णधार इमरान खानला सामनावीराच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. 
 
१३ नोव्हेंबर २००४ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये तिसरा एकदिवसीय सामना झाला. पाकिस्तानने एक षटक आणि सहा गडी राखून हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करणा-या भारताने २९२ धावा केल्या. पाकिस्तानने ४९ षटकात हे आव्हान पार केले. १०८ धावांची खेळी करणारा सलामीवीर सलमान बट्टला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले. 
 
३ जानेवारी २०१३ मध्ये भारत-पाकिस्तानमध्य ईडन गार्डनवर चौथा एकदिवसीय सामना झाला. प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने २५० धावा केल्या. भारताचा डाव १६५ धावांवर आटोपला. पाकिस्तानने हा सामना ८५ धावांनी जिंकला. १०६ धावांची शतकी खेळी करणारा सलामीवीर नासीर जमशेदला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले. 
 
भारत आणि पाकिस्तानममध्ये १२७ एकदिवसीय सामने झाले. त्यातील ७२ सामने पाकिस्तानने आणि ५१ सामने भारताने जिंकले. पाच सामने रद्द झाले. 
 
१६ ऑक्टोबर १९५२ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर पहिला कसोटी सामना झाला. भारताने हा सामना एक डाव आणि ७० धावांनी जिंकला. 
 
१६ फेब्रुवारी १९९९ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर कसोटी सामना सुरु झाला होता. पाकिस्तानने हा सामना ४६ धावांनी जिंकला होता. पाकिस्तानचा सलामीवीर सईद अन्वर आणि भारताचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथला सामनावीराचा पुरस्कार विभागून देण्यात आला होता. 
 
१६ मार्च २००५ मध्ये भारत आणि पाकिस्तान ईडन गार्डनवर कसोटी सामना खेळला गेला. हा सामना भारताने १९५ धावांनी जिंकला होता. या कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणा-या राहुल द्रविडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 
 
ईडन गार्डन मैदानावरील पाच कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. 
भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ५९ कसोटी सामने झाले. त्यातील नऊ सामने भारताने तर, १२ कसोटी सामने पाकिस्तानने जिंकले. ३८ कसोटी सामने अर्निर्णीत राहिले होते.