शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पाकने विश्वकप स्पर्धेवर बहिष्कार टाकू नये

By admin | Published: December 13, 2015 11:18 PM

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात

कराची : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतात होणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करू नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बोर्डाला दिला आहे. अक्रम म्हणाला, ‘‘भारत पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ घेत आहे. पण ही मालिका आता झाली नाही तरी भविष्यात लवकरच होईल, अशी आशा आहे. भारतीय बोर्डाने खेळण्यास इच्छुक आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट उत्तर द्यायला हवे. त्यामुळे हा मुद्दा निकाली निघेल.’’दरम्यान, पाकिस्तानने कुठल्याही परिस्थितीत विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार करू नये, असेही अक्रम म्हणाला.अक्रमने सांगितले, ‘विश्व टी-२० आयसीसीची स्पर्धा असून यात कुठल्याही परिस्थितीत खेळणे आवश्यक आहे. जर आम्ही असे केले नाही तर प्रदीर्घ कालावधीपर्यंत नुकसान सोसावे लागेल.’पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान म्हणाले होते, की पीसीबी विश्व टी-२० स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी सरकारकडून सुरक्षेची हमी मागणार आहे.अक्रम म्हणाला, ‘भारतात मला तसेच प्रेम मिळाले जसे पाकिस्तानमध्ये सचिन तेंडुलकरला मिळाले.’(वृत्तसंस्था)विश्व टी-२० स्पर्धेत न खेळल्यामुळे आमच्या खेळाडूंवर आणि आमच्या क्रिकेटवर परिणाम होईल. भारत आमच्यासोबत खेळण्यास इच्छुक नाही तर कुठली अडचण नाही. आम्ही त्यांच्यासोबत न खेळताही जीवन जगू शकतो. आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो तरी त्यामुळे दहशतवादाची समस्या संपणार नाही.- वसीम अक्रम, माजी कर्णधार, पाकिस्तान