शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

पाक संघ भारतात जाणार नाही : सेठी

By admin | Published: January 17, 2016 3:04 AM

भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही

कराची : भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही, असे वक्तव्य करून ‘आगीत तेल ओतण्याचे’ काम केले आहे.सेठी म्हणाले, ‘‘बीसीसीआयने आधी आपल्या वाट्याला आलेली मालिका आयोजित करावी. त्यानंतरच आम्ही भारत दौऱ्याचा विचार करू. भारताला डिसेंबरमध्ये मालिका खेळायची होती, पण त्यांनी करारानुसार मालिका आयोजनाचे धाडस दाखविले नाही. भारताने स्वत:चे उत्तरदायित्व सिद्ध करायला हवे. भारतीय संघ आमच्यासोबत संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका किंवा कुठल्याही तटस्थ स्थळी खेळू शकतो. पण या तटस्थ ठिकाणी खेळण्यावर परस्पर सहमती तरी किमान आवश्यक आहे.’’ भारत-पाकने २०१४मध्ये एका करारानुसार दोन्ही देशांत २०१५ ते २०२३ या काळात सहा द्विपक्षीय मालिकांचे आयोजन व्हायचे असून, पहिली मालिका पाकिस्तानात खेळली जाणार होती. भारताने मालिका टाळली. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी नुकतीच भारत-पाक मालिका आयोजनाची शक्यता फेटाळून लावली. सेठी म्हणाले की, उभय देशांचे सरकार तयार असेल तर मालिका होऊ शकेल. पण त्यासाठी खेळण्याची इच्छा असणे गरजेचे आहे.’’आम्ही कुठल्याही तटस्थ ठिकाणी खेळण्यास तयार आहोत. केवळ चांगला महसूल मिळण्याची अट आहे. २०१२मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास पाक संघ गेला होता, पण महसुलाचा वाटा आम्हाला मिळालेला नाही. जोवर भारतीय संघ आमच्या यजमानपदाखाली मालिका खेळत नाही तोवर २०१७चा भारत दौरा करण्याचे कारण नाही.- नजम सेठी