शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत पाकिस्तान संघ भारतात येणार नाही - शाहरयार खान

By admin | Published: March 11, 2016 9:41 AM

भारतीय सरकार जोपर्यंत सार्वजनिकपणे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सुरक्षेची हमी देत नाही तोपर्यंत क्रिकेट संघ भारतासाठी रवाना होणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शाहरयार खान बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
इस्लामाबाद, दि. ११- भारतीय सरकार जोपर्यंत सार्वजनिकपणे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सुरक्षेची हमी देत नाही तोपर्यंत पाकिस्तान पुरुष आणि महिला क्रिकेट संघ भारतासाठी रवाना होणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शाहरयार खान बोलले आहेत. भारतातील काही संघटना पाकिस्तान संघावर हल्ला करु शकतात त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय सरकारकडून सुरक्षेची हमी हवी आहे. 
 
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार जोपर्यंत सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही भारतात येणार नाही असं शाहरयार खान यांनी स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांनी पाकिस्तान संघाला हिरवा कंदील दाखवल्याच्या निर्णयाच त्यांनी स्वागत केलं. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रत्येत संघाला वेगळी हमी देऊ शकत नसल्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. 
 
अनुराग ठाकूर यांनी कोणत्या एका संघाला वेगळी हमी देऊ शकत नाही असं म्हणलं आहे. मात्र फक्त पाकिस्तान संघाला विरोध होत आहे ही गोष्ट त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पाकिस्तान संघाच्या परिस्थितीची इतर संघांशी तुलना करु शकत नाही. त्यामुळे आम्ही एका ओळीची सुरक्षेची हमी मागत असल्याचं शाहरयार खान यांनी सांगितलं आहे.
खेळाडूंची कुटुंबदेखील त्यांच्यासोबत असतील त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचादेखील प्रश्न आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. कोणत्याही कुटुंबाला आपल्या मुलांसोबत अशा वातावरणात जाण्याची भीती वाटेल. कधी लोक भडकतील आणि दगडफेक सुरु करतील तुम्ही सांगू शकत नाही. जेव्हा अशा परिस्थितीची सामना तुम्ही करणार असता तेव्हा कुणीतरी त्याची जबाबदारी घेणं गरजेच असत असंही शाहरयार खान बोलले आहेत. 
 
पाकिस्तान क्रिकेट संघ मात्र या निर्णयावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तान संघ भारतात येऊन टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यास प्रचंड उत्सुक आहे.