शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

महाविद्यालयीन क्रीडा व्यवस्थेवर लक्ष द्या!, नेमबाज अभिनव बिंद्राने दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:22 IST

Abhinav Bindra : एका क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या बिंद्राने म्हटले की, ‘टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरली.

मुंबई : ‘महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा व्यवस्था अपेक्षेनुसार सुधारण्यात अद्याप आपल्याला यश आलेले नाही. यामुळे ज्युनिअर ते एलिट स्तरापर्यंत आपल्याला पुरेशी गुणवत्ता दिसून आली नाही,’ असे सांगतानाच भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने तीन वर्षात पुढील ऑलिम्पिक खेळणे कठीण ठरेल, असे मत व्यक्त केले.

एका क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या बिंद्राने म्हटले की, ‘टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरली. यामध्ये आपण आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ पदके जिंकली. शानदार विजयांसोबतच काही निराशाजनक क्षणही आले. पण खेळामध्ये असे होतच असते. पुढील ऑलिम्पिक अधिक आव्हानात्मक ठरेल, कारण तयारीसाठी केवळ तीन वर्षांचा कालावधी आहे. साधारणपणे, ऑलिम्पिकनंतर खेळाडू एक वर्ष आराम करून तणाव घालवण्याचा प्रयत्न करतात. पण आता लगेच पुढील मोहिमेसाठी मैदानात यावे लागेल.’

- महाविद्यालयीन स्तरावर खेळांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे सांगताना बिंद्रा म्हणाला की, ‘देशभरात महाविद्यालयातील क्रीडा व्यवस्था अधिक सुधारावी लागेल. - अधिकाधिक स्पर्धात्मक उपक्रम राबवावे लागतील. योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे आपण ज्युनियरपासून एलिट स्तरापर्यंतच्या अनेक गुणवत्तेला मुकलो आहोत.’