शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

‘पीसीबीचा बीसीसीआयला ४८ तासांचा अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2015 11:26 PM

भारतासोबतच्या संभाव्य द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी जाहीर केले.

कराची : भारतासोबतच्या संभाव्य द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी जाहीर केले. शहरयार म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आम्हाला शनिवारी सायंकाळपर्यंत कुठलेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मालिकेबाबतच्या सर्व आशा संपुष्टात आल्या सारख्या आहेत. तरीही आम्ही बीसीसीआयला पत्र लिहून ४८ तासांत मालिकेविषयी निश्चित निर्णय द्यावा, असे कळविले आहे. याबाबत आम्ही सोमवारी अधिकृत घोषणा करणार आहोत.’ पीसीबी अध्यक्ष म्हणाले, ‘मालिकेचे आयोजन रद्द होण्यासाठी पाकिस्तानला कुठल्याच प्रकारे जबाबदार धरता येणार नाही. आम्ही हा मुद्दा आयसीसीपुढे मांडण्याचा विचार करीत आहोत.’भारत आणि पाकिस्तानने गेल्या वर्षी एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्या करारानुसार उभय देशांदरम्यान २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा द्विपक्षीय मालिकांचे आयोजन करण्यात येणार होते. भारत सरकारतर्फे अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि शहरयार यांनी दुबईमध्ये आयसीसीच्या बैठकीदरम्यान द्विपक्षीय मालिका आयोजिण्यास सहमती दर्शविली होती, पण बीसीसीआयने मालिकेबाबतचा अंतिम निर्णय सरकारवर सोपवला होता.>> आम्ही भारतीय संघासोबत खेळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आयोजन स्थळ यूएईला वगळून श्रीलंका केले, पण आमचे सर्व प्रयत्न अखेर व्यर्थच ठरले. त्यामुळे जगातील लक्षावधी चाहत्यांचा हिरमोड झाला. गेल्यावर्षी आम्ही मालिकेबाबत बीसीसीआयसोबत करार केला होता. आम्ही आमच्यातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले.- शहरयार खान