शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

एका रात्रीत चित्र बदलले

By admin | Published: March 07, 2017 12:50 AM

मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता

हर्षा भोगले लिहितो..मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता, ‘तुम्ही आम्हाला बच्चे समजले होते, पण तुम्ही तर मायदेशातच कमकुवत भासत आहात, खरे आहे ना हे?’ भारतीय संघाला अनपेक्षित कोनातून आपल्याच बॉक्सिंग ग्लव्हजमधून ठोशे स्वीकारावे लागले. चॅम्पियन्स संघ निमूटपणे हे सहन करीत असल्याचे चित्र दिसले. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला काय घडले हे मला माहीत नाही. याची माहिती घेण्यासाठी माशी बनून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील भिंतीवर बसायला मला आवडले असते. एका रात्रीत भारतीय संघाचे रूप पालटले. चवताळलेला भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर चालून गेला. त्यामुळे उभय संघांदरम्यान कसोटी खेळाची रंगत अनुभवाला मिळाली. तिसऱ्या दिवशी तर भारतीय संघाने काही अंशी वर्चस्वही मिळवले. सध्या यार्ड पुढे आहे असे म्हणण्यापेक्षा इंचभर पुढे आहे, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. भारताने चाहत्यांसह आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वत:ला लढवय्या संघ असल्याचे दाखवून दिले. लोकेश राहुल दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध केलेले आहे. कुठल्याही खेळाडूसाठी फलंदाजीला खडतर असलेल्या या खेळपट्टीवर या तिन्ही क्रिकेटपटूंनी शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी अविश्वसनीय भासत आहे. भारतात मात्र हे घडत असते. या खेळपट्टीवर फलंदाजांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक आहे. येथे १८०-२०० धावांचे लक्ष्य पुरेसे नाही. भारताला येथे ३००च्या जवळपास धावांच्या लक्ष्याची गरज आहे. त्यासाठी खेळपट्टीवर असलेल्या पुजारा व रहाणे यांच्या व्यतिरिक्त करुण नायर याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करणाऱ्या नॅथन लियोनचा मारा खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ३०० धावांचे लक्ष्य असले म्हणजे कोहली आणि आश्विनला संयम बाळगता येईल. कमी धावसंख्येचे लक्ष्य असेल तर त्यांच्यावर मर्यादा येईल. संयम बाळगला तर अनुकूल निकाल मिळवता येतात आणि घाई केली तर चूक होण्याची शक्यता असते. पुजारा व रहाणे लढवय्ये फलंदाज आहेत. कारकिर्दीत त्यांनी बरेचदा अशी कामगिरी केली आहे. मंगळवारी त्यात जर ते यशस्वी ठरले तर ही मालिका पुणे सोडल्यानंतर भासली होती त्यापेक्षा नक्कीच वेगळी भासेल. (पीएमजी)