शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम जाहीर

By admin | Published: August 15, 2014 12:27 AM

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले असून, ३० आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी हैदराबादमध्ये रंगणार आहे. वन-डे मालिकेला ८ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.दौऱ्याचा प्रारंभ ८ आॅक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या वन-डेने होणार आहे. दुसरा वन-डे ११ आॅक्टोबरला विशाखापट्टणममध्ये खेळल्या जाणार आहे. कटक व कोलकाता येथे अनुक्रमे तिसरा व चौथा वन-डे १४ व १७ आॅक्टोबरला खेळला जाईल. मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना २० आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे होईल. एकमेव टी-२० सामना नवी दिल्ली येथे २२ आॅक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीचा अपवाद वगळता, मर्यादित षटकांचे उर्वरित सामने दिवस/रात्र खेळले जाण्याची शक्यता आहे. वन-डे मालिका व टी-२० सामन्यानंतर ३० आॅक्टोबरपासून हैदराबाद येथे कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दुसरा कसोटी सामना ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत बेंगळुरूमध्ये तर तिसरा व शेवटचा कसोटी सामना १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद येथे रंगणार आहे. (वृत्तसंस्था)