शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

पुजारा, कोहली निराशाजनक कालखंडात

By admin | Published: August 12, 2014 1:29 AM

मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात या दोन्ही फलंदाजांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात पुजारा १७ व कोहली ७ धावा काढून माघारी परतले.

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरने निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीतील आधारस्तंभ मानल्या जाणारे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा इंग्लंड दौऱ्यात त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत निराशाजनक कालखंडातून वाटचाल करीत आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला सलग दोन कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्याचे मुख्य कारण कोहली व पुजारा यांचा सुमार फॉर्म असल्याचे मानले जात आहे.मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात या दोन्ही फलंदाजांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात पुजारा १७ व कोहली ७ धावा काढून माघारी परतले. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. पुजारा व कोहली यांच्या व्यतिरिक्त मुरली विजय, गौतम गंभीर व अजिंक्य रहाणे यांनी या लढतीत दोन्ही डावांमध्ये केवळ ८९ धावा केल्या. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आघाडीच्या फळीची ही सातव्या क्रमांकाची निराशाजनक कामगिरी आहे.राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारताच्या मधल्या फळीत विश्वासपात्र फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणारा पुजारा यंदा सुरुवातीपासून धावा काढण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्याने गेल्या वर्षी जोहान्सबर्गमध्ये अखेरचे शतक झळकाविले होते. हा दिल्लीकर फलंदाज इंग्लंडमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. वेलिंग्टनच्या खेळीनंतर कोहलीची कसोटी सरासरी ४६.५१ अशी होती, आता त्यात घसरण झाली असून, ४०.६४ वर आली आहे. कारकिर्दीतील तिसऱ्यांदा त्याची सरासरी ४० पेक्षा कमीवर घसरण्याची शक्यता आहे.द्रविड व लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारताच्या मधल्या फळीची जबाबदारी पुजारा व कोहली यांच्यावर आली. या दोघांनी त्यानंतर ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. द्रविड-लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर पुजाराने २० सामन्यांत ५६.४५ च्या सरासरीने १७५० धावा फटकाविल्या. त्यात ६ शतकी खेळींचा समावेश आहे. कोहलीने या सर्व २० सामन्यांत प्रतिनिधित्व करताना ४४.६० च्या सरासरीने १३३८ धावा फटकाविल्या. भारताने या २० पैकी १० सामन्यांत विजय मिळविला तर ६ सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पुजाराने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या उपस्थितीत भारताने १२ सामन्यांत विजय मिळविला. त्यात पुजाराने ७४.२५ च्या सरासरीने ११८८ धावा फटकाविल्या. त्याच्या निराशाजनक कामगिरीचा संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडला. पुजाराच्या उपस्थितीत संघाला ६ वेळा पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)