शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 10:06 IST

किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला.

नवी दिल्ली : किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. आता पुढील वर्षात अत्यंत व्यस्त वेळापत्रक असून, यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी श्रीकांतला चुका करण्यावर नियंत्रण राखावे लागेल, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी दिली. श्रीकांतला रविवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा श्रीकांत भारताचा पहिला पुरुष शटलर ठरला होता.

गोपीचंद यांनी सांगितले की, ‘प्रत्येक सामन्यागणिक श्रीकांतच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, परंतु ली जी जिया आणि केंटो मोमोटा यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध केलेल्या शानदार खेळाने त्याचा आत्मविश्वास उंचावला. 

विशेष म्हणजे त्याला योग्य वेळेला लय मिळाली. आता पुढील वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा यासारख्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला आपल्या चुकांवर नियंत्रण राखावे लागेल.’

गोपीचंद पुढे म्हणाले की, ‘सलग स्पर्धा खेळल्याने अनेक खेळाडूंसाठी दुखापतीतून सावरणे कठीण होते. श्रीकांतसोबतही असेच झाले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी त्याने पुनरागमनासाठी घाई केली. स्पेनमध्ये त्याला तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात खेळताना पाहून चांगले वाटले. सुदीरमन कप स्पर्धेपासून तो सातत्याने खेळत असून हे चांगले संकेत आहेत.’ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतसह एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनीही छाप पाडली. प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, तर लक्ष्य उपांत्य फेरीत पराभूत झाला. श्रीकांतने लक्ष्यलाच नमवीत अंतिम फेरीत धडक दिली होती. याबाबत गोपीचंद म्हणाले की, ‘या खेळाडूंना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये पोहोचल्याचे पाहून आनंद झाला. लक्ष्य आणि प्रणॉय यांनीही शानदार खेळ केला. आगामी महत्त्वाच्या सत्रासाठी ही चांगली चिन्हे आहेत.’ 

टॅग्स :Kidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतPullela Gopichandपुलेला गोपीचंद