शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

रवी शास्त्री प्रशिक्षक पदासाठी मैदानात

By admin | Published: June 28, 2017 12:45 AM

गेले काही दिवस विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे बीसीसीआयमधील वातावरण ढवळून निघाले आहे.

नवी दिल्ली : गेले काही दिवस विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे बीसीसीआयमधील वातावरण ढवळून निघाले आहे. कुणीही तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. तर्क-वितर्कांना पेव फुटले असताना विराट कोहली मात्र सर्वांवर मात करून गेला. स्वत:च्या पसंतीचे रवी शास्त्री प्रशिक्षकपदी यावेत म्हणून हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचे मीडियात प्रकाशित झाले. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचा मंगळवारी निर्णय घेतल्याने कोहलीची खेळी यशस्वी ठरल्याचे निष्पन्न झाले. बीसीसीआयनेदेखील प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची तारीख ९ जुलैपर्यंत वाढविली.शास्त्री हे फार इच्छुक असून पदासाठी अर्ज करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, २०१९ च्या विश्वचषकापर्यंत संपूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ सोपविण्याची हमी हवी असल्याची शास्त्री यांची अट आहे. शास्त्री यांना गोलंदाजी कोच भरत अरुण यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफदेखील स्वमर्जीतील हवा आहे. या सर्वांनी आधीच्या कार्यकाळात चांगली भूमिका बजावल्याचे शास्त्रींचे म्हणणे आहे. शास्त्री हे आॅगस्ट २०१४ ते जून २०१६ या कालावधीत भारतीय संघाचे संचालक राहिले. त्यांची जागा कुंबळे यांनी नंतर मुख्य कोच म्हणून घेतली. अलीकडे कोहलीशी मतभेद होताच कुंबळे यांनी पद सोडले आहे. कोच म्हणून शास्त्री हे कोहलीची प्रथम पसंती असून, दोघांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत, हे विशेष. अगदी ठरल्याप्रमाणे अखेर रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्याचे ठरवले. स्वत: रवी शास्त्री यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळे यांना मुदतवाढ मिळूनही कुंबळेंनी राजीनामा दिल्यामुळे बीसीसीआयला प्रशिक्षकपदाच्या अर्जासाठी मुदतवाढ द्यावी लागली. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघातील काही खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली अनिल कुंबळेंऐवजी रवी शास्त्री यांच्या नावासाठी आग्रही होते. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर प्रशिक्षक म्हणून निवड होणार असेल अशी खात्री बीसीसीआय देणार असेल तरच आपण अर्ज करू, असा पवित्रा शास्त्रींनी घेतल्याचे म्हटले जाते.