शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

खेळपट्टीच्या वेगामुळे आरसीबीचे फलंदाज चकित

By admin | Published: April 25, 2017 1:03 AM

रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला.

सौरभ गांगुली लिहितात...

रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला. त्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया अपेक्षित होती. बेंगळुरूसाठी ही महत्त्वाची लढत होती. या लढतीत गुणांची कमाई करता आली असती तर त्यांना गुणतालिकेतील स्थानामध्ये सुधारणा करण्याची संधी होती. ईडनच्या खेळपट्टीवर १३२ धावांचे लक्ष्य मोठे नव्हते, पण कोलकाताच्या वेगवान गोलंदाजांनी बेंगळुरूला गुडघे टेकविण्यास भाग पाडले. सध्या ईडनगार्डन्सवरील खेळपट्टी देशातील सर्वोत्तम खेळपट्ट्यांपैकी एक आहे. या खेळपट्टीवर प्रत्येकाला आपली प्रतिभा दाखविण्याची संधी असते. रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत पहिल्या डावात फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांनी वरचष्मा राखला.आयपीएलच्या दहाव्या पर्वातील जवळजवळ अर्धा टप्पा आटोपला आहे. ईडनवरील वातावरण शानदार होते. येथे प्रत्येक तिकीट विकले गेले होते. देशभर आयपीएलच्या लढतींसाठी चाहते मैदानावर गर्दी करीत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये बेंगळुरूच्या यजुवेंद्र चहलसाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. राष्ट्रीय संघातर्फे चमकदार कामगिरी केल्यानंतर तो एक दर्जेदार गोलंदाज म्हणून छाप सोडत आहे. नाईट रायडर्सने आक्रमक सुरुवात केली होती, बेंगळुरूचे फिरकीपटू त्यांना रोखण्यात यशस्वी ठरले. स्टेडियममध्ये उपस्थित ७५ टक्के चाहत्यांना पाहुणा आरसीबी संघ सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. नॅथन कुल्टर नाईलने वेगवान मारा करीत सुरुवातीला विराट कोहलीला बाद केल्यामुळे केकेआरला लय गवसली. केकेआरने ईडनच्या खेळपट्टीला अनुकूल संघाची निवड केली होती. माझ्या मते बेंगळुरूचे खेळाडू खेळपट्टीच्या वेगामुळे चकित झाले असतील. कारण ख्रिस गेल आणि ए.बी. डिव्हिलियर्स यांच्यासारखे दिग्गज खेळाडू अशा पद्धतीने बाद झाल्याचे क्वचित बघायला मिळते. टी-२० क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ बाद होण्याचा योग दुर्लभ असतो. त्यामुळे रायडर्सला विजयाचे श्रेय द्यायला हवे. आयपीएलने आणखी एका नव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. काही संघ गुणतालिकेत वरच्या स्थानी आहेत तर काही संघांची तळाकडे घसरण झाली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स या दोन्ही संघांची कदाचित निराशा झाली असेल. गुजरातला गृहमैदानावर सलग दोन सामने गमवावे लागले. त्यामुळे हा संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुधारणा होत असल्याचे दिसत असलेल्या संघामध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट््स संघाचा समावेश आहे. धोनीला सूर गवसला असून संघ व्यवस्थापनाने योग्यवेळी समतोल साधल्यामुळे संघाची कामगिरी चांगली होत आहे.(गेमप्लान)