शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

आरसीबीला विजयाचे समाधान

By admin | Published: May 15, 2017 7:02 AM

अखेरच्या सामन्यातही विराट सेना अपेक्षित खेळ करू शकली नसली, तरी दिल्ली डेअरडेविल्सवर विजय मिळवल्याचे समाधान मात्र विराट कोहलीला नक्कीच मिळाले असेल.

आकाश नेवे /आॅनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 - अखेरच्या सामन्यातही विराट सेना अपेक्षित खेळ करू शकली नसली, तरी दिल्ली डेअरडेविल्सवर विजय मिळवल्याचे समाधान मात्र विराट कोहलीला नक्कीच मिळाले असेल. कोहलीने दिल्लीच्या चाहत्यांची निराशा केली नाही, कोटलाचे मैदान हे कोहलीचे होमग्राऊंड आहे. त्याने या खेळपट्टीवर आज दमदार खेळी केली. त्याच खेळीच्या बळावर आरसीबीने १६१ धावा केल्या आणि पवन नेगी, हर्षल पटेल यांच्या सुरेख गोलंदाजीने दिल्लीवर विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कोहलीला गवसलेला सूर हे सामन्यात महत्त्वाचे ठरले. त्याने ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. तीन षटकार आणि तीन चौकारलगावत केलेल्या या खेळीला विशेष महत्त्व आहे. या सामन्याचा आयपीएल गुणतालिकेवर कोणताही फरक पडणार नसला, तरी चाहत्यांनी विराट कोहलीची खेळी पाहण्याची स्टेडियममध्ये चांगलीच गर्दी केली होती. त्यांना पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला विराट बघायला मिळाला. कोहली आणि गेल बाद झाल्यावर आरसीबीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी केली. ट्रॅव्हिस हेड आणि केदार जाधव, तर ताळमेळ नसल्यानेच धाव बाद झाले.त्यामुळे आरसीबीची धावसंख्या मर्यादित राहिली. अनुभवी जहीर खान याने कोहलीची खेळी संपुष्टात आणली. दिल्लीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पदार्पण करणाऱ्या आवेश खान याने संजू सॅमसनला बाद केले. मात्र करुण नायर, श्रेयस अय्यर आणि ऋषभपंतने दिल्लीचा डाव सांभाळला. मोहंमद शमी याने आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना ९ चेंडूत २१ धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. आरसीबी गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर आहे. आतापर्यंत स्पर्धेत फक्त तीनसामन्यांत विजय मिळवता आला. मात्र स्पर्धेचा निरोप घेताना किमान अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्याचे समाधान आरसीबीला असेल.