शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

आयपीएलसाठी वापरण्यात येणार पुनर्प्रक्रिया सांडपाणी, एमसीएची न्यायालयात माहिती

By admin | Published: April 12, 2016 11:52 AM

आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर आयपीएल सामने महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात यावेत मागणी करणा-या याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  (बीसीसीआय) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञातत्र सादर करत आपली बाजू मांडली. आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे.
 
आरडब्ल्यूआयटीसीतर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा खेळपट्टींच्या वापरासाठी आम्हाला भरपूर होईल, यामुळे पिण्यायोग्य पाणी न वापरता पाणीप्रश्नाचा सामना करणं सोपं जाईल अशी बाजू एमसीएने मांडली आहे. मुंबई आणि पुण्यात आयपीएलच्या होणा-या 17 सामन्यांमध्ये पुनर्प्रक्रिया करण्यात आलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यात येईल अशी माहिती बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.
 
तसंच किंग्ज इलेव्हन पंजाब आपले 3 सामने जे नागपूरमध्ये खेळण्यात येणार आहेत ते मोहालीला हलवण्यास तयार असल्याचंही वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी आरडब्ल्यूआयटीसीला विनंती करत महालक्ष्मी रेस कोर्सवर असणा-या सांडपाणी प्रक्रिया प्लांटमधील पाणीपुरवठा आयपीएल सामन्यांसाठी करण्याची विनंती केली होती. आरडब्ल्यूआयटीसीतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धां संपल्या आहे.पाण्याचा वापर ते रेसट्रॅकची देखभाल करण्यासाठी वापरतात. पवारांनी केलेली विनंती  आरडब्ल्यूआयटीसीने स्विकारली आहे त्यामुळे एमसीएला दिलासा मिळाला आहे.