शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

दुष्काळाविषयी योग्य निर्णय देण्यात येईल : विराट कोहली

By admin | Published: April 12, 2016 3:39 AM

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यावरून वाद सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही

बंगळुरू : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यावरून वाद सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही आपली प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा असून, या प्रकरणातील दोन संबंधित पक्ष संमजसपणे मार्ग काढतील, असे मत कोहलीने व्यक्त केले. कोहलीने यासंबंधी सांगितले, ‘‘जर यातून मार्ग काढण्यात आला, तर मला विश्वास आहे, की दोन्ही संबंधित पक्ष यातून पुढे जाण्याचा मार्ग काढतील. शिवाय, दोन्ही पक्ष दोन्ही बाजूंचा विचार करून सर्वश्रेष्ठ निर्णय घेतील.’’ त्याचप्रमाणे, ‘‘सध्या तरी ज्याप्रकारे आपल्याला चित्र दिसतेय, तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच मलाही अंतिम निर्णयाची उत्सुकता लागली आहे,’’ असेही कोहलीने सांगितले.आयपीएलदरम्यान खेळपट्टीवर पाणी वापरण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकेनंतर महाराष्ट्रातील आयपीएल आयोजनावरून वाद निर्माण झाला होता. शिवाय, नुकतीच कर्नाटक उच्च न्यायालयातही याच प्रकारची याचिका एका पर्यावरण कार्यकर्त्याने सादर केली. याबाबतही कोहलीने निश्चितच सर्वोत्तम पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगितले. याविषयी कोहली वैयक्तिक मत देताना म्हणाला, ‘‘याप्रकरणी माझे मत महत्त्वाचे आहे, असे मला वाटत नाही. हे प्रकरण सोडवणे अधिकारी व उच्च पदावर बसलेल्यांवर अवलंबून आहे. ते नक्कीच यामध्ये योग्य निर्णय देतील.’’ (वृत्तसंस्था) राजकोटमधील आयपीएल सामन्याला भाजपाच्या माजी खासदारांचा विरोधराजकोट : भाजपाचे माजी खासदार सिद्धार्थ परमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दलित महासंघाच्या सदस्यांनी शहर आणि गुजरातच्या अन्य भागातील पाण्याची तीव्र टंचाई पाहता कांधेरी स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या आयोजनाला विरोध करताना येथे धरणे आंदोलन केले़ परमार आणि त्यांच्या समर्थकांनी येथे सिव्हिल हॉस्पिटल सर्कलवर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन केले़