शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

रिओ ऑलिम्पिक : भारत १२ ते १५ पदक जिंकेल...

By admin | Published: July 11, 2016 5:54 PM

बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना

नवी मुंबई : बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना, भारतीय ओलिम्पिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू १२ ते १५ पदक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. गतस्पर्धेच्या तुलनेत दुप्पट पदकं जिंकण्यात भारताला यश येईल, असे आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना मेहता म्हणाले की, यंदाच्या स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असून, आम्हाला विश्वास आहे की, भारतीय खेळाडू यावेळी १२ ते १५ पदकं जिंकण्यात यशस्वी होतील. तसेच, आम्हाला प्रत्येक खेळाडूकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असून सायना, जीतू, विकास कृष्णन, टेनिसमध्ये दुहेरी जोडी, तिरंदाजी, कुश्ती आणि हॉकी संघाकडून विशेष आशा आहे, असेही मेहता यांनी सांगितले.
त्याचवेळी, ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे प्रमुख राकेश गुप्ता यांनी मात्र सावध भूमिका घेताना सांगितले की, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये १५ पदक मिळवण्याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, परंतु एक मात्र नक्की की यावेळी भारताला गतआॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक मिळतील.ह्णह्ण २०१२ साली झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदक जिंकले होते.
मिशन ऑलिम्पिकच्या एका अहवालानुसार भारताला यावेळी २० पदकांची आशा आहे. याबाबत विचारले असता गुप्ता यांनी सांगितले की, ह्यह्यमी अजून हा अहवाल पाहिला नसून हा अहवाल बघितल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. आम्ही १५ पदकांची शाश्वती नाही देऊ शकत, मात्र गतस्पर्धेच्या तुलनेत यावेळी नक्कीच अधिक पदक जिंकू.ह्णह्ण
सध्या संघटनेच्या वादामुळे चर्चेत असलेल्या बॉक्सिंग खेळाबाबत गुप्ता यांनी म्हटले की, ह्यह्यराष्ट्रीय संघटना नसल्याने भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी कमी मिळाली. तरीही, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.