शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

"सचिन, लक्ष्मण आणि गांगुलीने कुंबळेशी साधी चर्चाही केली नव्हती"

By admin | Published: June 27, 2017 11:19 AM

सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेशी कधीच चर्चा केली नव्हती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या मतभेदानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊन आठवडा उलटला असला तरी अद्याप चर्चा थांबलेली नाही. रोज या प्रकरणी काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे. हा संपुर्ण वाद समोर आला तेव्हा क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) कुंबळे आणि कोहलीसोबत चर्चा करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेशी कधीच चर्चा केली नव्हती. त्यांनी फक्त विराट कोहलीशी चर्चा करत संपुर्ण वाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. 
 
बीसीसीआयच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ""कोहलीशी चर्चा केल्यानंतर सल्लागार समितीने सर्व काही ठीक असून ही काही मोठी समस्या नाही, तसंच संघाचं प्रदर्शनही चांगलं असल्याने कुंबळेला हटवण्याची गरज नाही असा निष्कर्ष काढला होता"". कुंबळेने गेल्या एक वर्षात चांगली कामगिरी केली असल्याने सल्लागार समितीने कुंबळेला भेटून त्याची बाजू जाणून घेण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. आणि कदाचित याच गोष्टीमुळे विराट कोहली नाराज झाला होता. चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर विराट कोहलीने लंडनमध्ये बीसीसीआय अधिका-यांशी यासंबंधी चर्चा केली. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""बोर्डाला आपला निर्णय कळवल्यानंतर सल्लागार समिती या बैठकीत सहभागी झाली नाही. या बैठकीत कुंबळे आणि कोहली यांच्या व्यतिरिक्त बीसीसीआय अधिकारी अमिताभ चौधरी, राहुल जोहरी आणि एमवी श्रीधर उपस्थित होते"". यानंतर कुंबळेकडे संघासोबत वेस्ट इंडिज दौ-यावर जाण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही त्याने तात्काळ राजीनामा देऊन टाकला. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""45 मिनिटांच्या या बैठकीत कोहलीच जास्त वेळ बोलत होता. त्याने आपल्याला कुंबळेसोबत काम करण्यावर तसंच त्याच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर आक्षेप असल्याचं सांगितलं. हा कुंबळेसारख्या महान खेळाडूचा अपमान होता. त्यामुळेच कदाचित आपला कार्यकाळ पुर्ण होण्याच्या आधीच कुंबळेने राजीनामा देऊन टाकला. सोबतच वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जाण्यासही नकार दिला"".