शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनामुळे भारतात नेमबाजीचा सराव असुरक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 05:33 IST

भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची रायफल नेमबाज अंजुम मुद्‌गिल हिने कोरोना संकटाचा सामना करीत असलेल्या भारतात सराव करणे असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. भारताऐवजी क्रोएशियात सराव करणे हितावह असेल, असे मत तिने व्यक्त केले. (Shooting practice unsafe in India due to corona)ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारतीय नेमबाजांचे १५ सदस्यांचे पथक ११ मे रोजी जगरेबला रवाना होणार आहे. तेथूनच हे खेळाडू थेट टोक्योकडे प्रस्थान करतील. टोक्यो ऑलिम्पिक २३ जुलैपासूृन सुरू होईल. त्याआधी क्रोएशिया येथे २० मे ते ६ जून दरम्यान होणाऱ्या युरोपियन चॅम्पियनशिप व त्यानंतर २२ जून ते ३ जुलै या कालावधीत आयोजित विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होतील.साईने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मुद्‌गिल म्हणाली,‘ भारतात सध्या सराव करणे योग्य नाही. माझ्याकडे ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनसाठी खासगी रेंज उपलब्ध नाही. त्यासाठी मला दिल्ली किंवा पुण्यात जावे लागेल. तथापि, सद्यस्थितीत ही दोन्ही शहरे कोरोनामुळे सर्वांत असुरक्षित आहेत. भारताच्या तुलनेत क्रोएशिया हे सुरक्षित स्थळ असून, संघासोबत वास्तव्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. आम्हाला घरापासून दूर राहण्यात कुठलीही अडचण नाही.’भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे. दीर्घकाळ ब्रेकनंतर सांघिकपणे सराव करण्याचा लाभ आत्मविश्वास उंचाविण्यात होईल. मी लसीचे दोन्ही डोज घेतले असून, इतरांनीही लसीकरण करून घ्यावे, असे माझे आवाहन आहे. ’

टॅग्स :Shootingगोळीबार