शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

आश्विनच्या फिरकीपुढे श्रीलंका चीत

By admin | Published: August 25, 2015 4:24 AM

रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

कोलंबो : रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने महान फलंदाज कुमार संगकाराला विजयाने निरोप देण्याच्या श्रीलंका संघाचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताने विजयासाठी दिलेल्या ४१३ धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारानंतर ४३.४ षटकांत १३४ धावांत संपुष्टात आला. आश्विनने ४२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला कसोटी विजय ठरला. भारताने सुरुवातीपासून या लढतीत वर्चस्व कायम राखले. गॉलमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पत्कराव्या लागलेल्या नाट्यमय पराभवादरम्यान झालेल्या चुकांपासून बोध घेत भारताने या लढतीत चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या बाजूचा विचार करताना संगकाराच्या चमकदार कारकिर्दीचा हा निराशाजनक शेवट ठरला. त्याला अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रीलंका संघाने अखेरच्या ७ विकेट ५८ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्याआधी, पावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेपूर्वीच उपाहारासाठी खेळ थांबविण्यात आला. लेगस्पिनर अमित मिश्राने दुष्मंता चामिराला (४) बाद करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने उपाहारानंतर पाचव्या चेंडूवर विजय निश्चित केला. आश्विन व्यतिरिक्त मिश्राने २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व उमेश यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. यजमान संघातर्फे दिमुथ करुणारत्नेने १०३ चेंडूंना सामोरे जाताना ४६ धावांची खेळी केली. करुणारत्नेचा अपवाद वगळता आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. उभय संघांदरम्यान तिसरा व निर्णायक कसोटी सामना २८ आॅगस्टपासून खेळला जाणार आहे.श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. आज पहिल्याच चेंडूवर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बाद झाला. कालच्या २ बाद ७२ धावसंख्येवरून पुढे खेळताना श्रीलंकेने २२व्या षटकात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची विकेट गमावली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर तो बदली यष्टिरक्षक राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. मिश्राने २८व्या षटकात दिनेश चांदीमलला (१५) तंबूचा मार्ग दाखविला. श्रीलंकेने ३०व्या षटकात शंभर धावांचा पल्ला गाठला. पहिल्या तासाभराच्या खेळानंतर श्रीलंकेची ४ बाद १०६ अशी अवस्था होती. आश्विनने सहाव्या चेंडूवर लाहिरू थिरीमानेला (११) बाद केले. त्यानंतरच्या षटकात ईशांतने जेहान मुबारकला (०) खाते उघडण्यापूर्वीच दुसऱ्या स्लिपमध्ये कर्णधार कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. आश्विनने ३७व्या षटकात धम्मिका प्रसादला (०) आणि त्यानंतर दोन षटकांनी करुणारत्नेला तंबूचा मार्ग दाखवून डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. उपाहाराला १४ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना मिश्राने थारिंडू कौशलला (५) पायचित केले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचांनी उपाहारासाठी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. उपाहारानंतर मिश्राने चामिराला बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (वृत्तसंस्था)धावफलकभारत पहिला डाव ३९३. श्रीलंका पहिला डाव ३०६. भारत दुसरा डाव ८ बाद ३२५ (डाव घोषित).श्रीलंका दुसरा डाव : कौशल सिल्वा झे. बिन्नी गो. आश्विन ०१, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. आश्विन ४६, कुमार संगकारा झे. विजय गो. आश्विन १८, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. यादव २३, दिनेश चांदीमल त्रि. गो. मिश्रा १५, लाहिरू थिरिमाने झे. पुजारा गो. आश्विन ११, जेहान मुबारक झे. कोहली गो. ईशांत ००, धम्मिका प्रसाद झे. मिश्रा गो. आश्विन ००, रंगाना हेराथ नाबाद ०४, थारिंडू कौशल पायचीत गो. मिश्रा ०५, दुष्मंता चामीरा पायचीत गो. मिश्रा ०४. अवांतर (७). एकूण ४३.४ षटकांत सर्व बाद १३४. बाद क्रम : १-८, २-३३, ३-७२, ४-९१, ५-१०६, ६-१११, ७-११४, ८-१२३, ९-१२८, १०-१३४. गोलंदाजी : आश्विन १६-६-४२-५, यादव ७-१-१८-१, ईशांत ११-२-४१-१, मिश्रा ९.४-३-२९-३.