शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

लंकेची भारताविरुद्ध दर्जेदार खेळी

By admin | Published: June 10, 2017 4:50 AM

श्रीलंकेचा हा खूप मोठा विजय आहे. श्रीलंकेने ज्याप्रमाणे भारतावर मात केली त्याचा विचार देखील कुणी केला नव्हता. या दोन्ही संघाची तुलना केली असता दोन्ही संघांमध्ये मोठे अंतर होते.

श्रीलंकेचा हा खूप मोठा विजय आहे. श्रीलंकेने ज्याप्रमाणे भारतावर मात केली त्याचा विचार देखील कुणी केला नव्हता. या दोन्ही संघाची तुलना केली असता दोन्ही संघांमध्ये मोठे अंतर होते. भारताचा संघ बलाढ्य मानला जात होता. भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढला होता. खेळाडूंची कामगिरी देखील चांगली होती. श्रीलंकेचा विचार केला तर त्यांचा संघ पराभूत होऊन या सामन्यात खेळण्यासाठी आला होता. प्रमुख खेळाडूंची कामगिरी चांगली होत नव्हती. अँजेलो मॅथ्यूज्ने या सामन्यातून पुनरागमन केले. त्यामुळे कुठेही वाटले नव्हते की श्रीलंकेचा संघ या सामन्यात जिंकेल. मात्र क्रिकेट आणि खेळात काहीही होऊ शकते. श्रीलंकेच्या खेळाची दाद द्यावी लागेल. भारताने मोठी धावसंख्या उभारल्यानंतर देखील त्यांनी अजिबात दडपण घेतले नाही. त्यानंतरही त्यांनी या धावांचा पाठलाग केला. तो सर्वोत्तम होता. काही गोष्टी देखील त्यांच्या बाजूने घडल्या. टॉस जिंकणे तसेच पाऊस देखील आला नाही. त्यांचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. पूर्ण सामन्यात त्यांनी पाठलाग करण्यासाठी जी रणनीती अवलंबली ती नक्कीच कौतुकास्पद आहे. मला त्यांच्या खेळात कोणतेही दडपण जाणवले नाही. जाणवला तो त्यांचा उत्साह, जोश, त्यांनी केलेले नियोजन आणि एक सर्वोत्तम प्रेरणा.श्रीलंकेच्या खेळाडूंनी एक प्रकारे धैर्य मिळवले. भारताच्या शिखर धवन याने केलेले शतक, रोहित शर्माची चांगली धावसंख्या या भारताच्या जमेच्या बाजू होत्या. फॉर्ममध्ये असलेले विराट कोहली आणि युवराज सिंह हे धावा करू शकले नाही. तरीही भारताने मोठी धावसंख्या उभारली त्याचे श्रेय शिखर आणि रोहित यांच्या भागीदारीला द्यायला हवे. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी याने चांगला खेळ केला. त्यामुळेच श्रीलंकेला धैर्य मिळाले. त्यामुळे श्रीलंकेने ३०-३५ षटकांपर्यंत दोनपेक्षा गडी बाद होऊ न देण्याचे नियोजन केले. अशी परिस्थिती निर्माण केल्यास मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता येतो. वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगल्या धावा केल्यास मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता येतो. श्रीलंकेकडे देखील मोठे फटके खेळणारे खेळाडू आहेत. कुशाल परेरा, कुशाल मेंडिस, गुणथलिका यांची फलंदाजी अप्रतिम होती. मला अँजेलो मॅथ्यूज्चे विशेष कौतुक वाटते. त्याने कर्णधार म्हणून पुनरागमन केले. त्याने या सामन्यात अतिशय उत्तम नेतृत्व केले. त्याची फलंदाजी देखील उत्कृष्ट होती. त्याने संघाला कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही भूमिकेतून अतिशय चांगले सांभाळले. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला असता गोलंदाजीत भारत मागे पडला. या सपाट खेळपट्टीवर धावांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे होते. मात्र तेच भारताला करता आले नाही. फिरकीत रवींद्र जाडेजाचा दिवस चांगला नव्हता. त्याने ६ षटकांतच ५२ धावा दिल्या आणि तेथूनच भारताच्या हातून सामना निसटला, असे मला वाटते.-अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)