शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग

By admin | Published: June 22, 2016 8:33 PM

जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे

शिवाजी गोरे

पुणे, दि. 22 - जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे. आता प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळणार आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी संपूर्ण संघ आतुर असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने व्यक्त केला. बंगळुरू येथील साई सेंटर येथे सध्या भारतीय हॉकी संघाचा सराव सुरू आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सरदार सिंग याने लोकमतशी संवाद साधला. सरदार म्हणाला,  मार्गदर्शक रोलंट ओल्टमन्स प्रत्येक खेळाडूची जातीने तयारी करून घेत आहेत. युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या मनातील भीती घालविणे. उणिवा व चुकांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे याचा त्यामध्ये समावेश आहे. दीड महिन्यावर आॅलिम्पिक स्पर्धा आली आहे. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आपल्या संघाने बलाढ्य आॅस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात गोलशून्य बरोबरीत रोखले. पेनल्टी शूटआऊटमध्ये आपल्याला रौप्यपदक मिळाले, हा एक इतिहासच आहे. भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत कधीच प्रवेश केला नव्हता. आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या गटात असलेल्या इतर संघांची सध्या कामगिरी आणि आपली तयारी याबाबत काय सांगाल?जगज्जेत्या आॅस्ट्रेलियाला आपल्या संघाने अंतिम लढती शेवटपर्यंत झुंजवले. यावरून तुम्ही अंदाज करू शकता, की आपल्या संघाची तयारी कशी सुरू असेल. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. ओल्टमन्स यांचे संघाच्या कामगिरी सुधारण्याबाबतचे प्रयोग उपयोगात येत आहेत. त्यांनी संघातील खेळाडूंच्या शैलीत चांगलाच बदल घडवून आणला आहे. कॅनडासारखा संघ आपल्या गटात असला तरी आम्ही त्या संघाला कमी लेखणार नाही. प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळावा लागणार आहे. प्रत्येक संघाविरुद्ध खेळताना आम्हाला एक वेगळे नियोजन करावे लागणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने कोणतेही दडपण न घेता मनमोकळेपणाने खेळावे, असे त्यांचे म्हणणे असते. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध, दुसरा जर्मनी, तिसरा अर्जेंटिना, चौथा नेदरलॅँड आणि पाचवा कॅनडा त्यामुळे आम्ही जे काही गुण संपादन करायचे आहेत, ते पहिल्या चार लढतींमध्ये करावे लगणार आहेत.

संघाच्या प्रशिक्षणात कशावर भर दिला जात आहे?तंदुरुस्ती (फिटनेस), तंत्र (टेक्निक), चपळता, लाँग व शॉर्ट पासिंग यावर ओल्टमन्स यांचा जास्त भर असतो. आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी एकमेकांमध्ये समन्वय कसा साधायचा, यावर विशेष लक्ष दिले जात आहे. चॅम्पियन्स चषकातील चुका आम्हाला सुधाराव्या लागतील. आपण पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झालो. व्हिडिओ पंचांनी काहीही निर्णय देऊ द्यात, आम्हाला नक्कीच सुधारणा करावी लागणार आहे. हरमनप्रीत, रघुनाथ, उथप्पा, सुनील, सुरेंद्र, मनप्रीत यांच्या खेळात खूपच सुधारणा झाली आहे. चॅम्पियन्स चषकच्या अंतिम लढतीत श्रीजेशचे गोलरक्षण थक्क करणारे होते. पण तरीही प्रत्येक सामन्याच्या वेळी कोणाचा कसा खेळ होतो, हे महत्त्वाचे असते. ओल्टमन्स खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष देतात. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये, याकडे त्यांचे लक्ष असते. एकूण सराव आणि सध्या संघाची कामगिरी पाहता मी एवढेच सांगू शकतो, की आम्ही या वेळी आमच्या चाहत्यांना नाराज करणार नाही. 

आपल्या ब गटात जर्मनी, अर्जेंटिना, आयर्लंड, नेदरलँड आणि कॅनडा हे संघ आहेत. या वर्षीपासून प्रत्येक गटातील चार संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र होतील. त्यामुळे आम्हाला आमच्या गटात पहिल्या चार क्रमांकांमध्ये येणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण विरुद्ध संघाच्या उणिवा शोधून रणनीती आखत असतो. त्याचप्रमाणे समोरच्या संघाचे खेळाडू व मार्गदर्शक नियोजन करीत असतात. त्यामुळे आपले खेळाडू आपल्या मार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक सामन्यात खेळ त्या वेळी मैदानावर होईल तो महत्त्वाचा.युवा खेळाडूंना संधीसाठीच मला विश्रांतीपुढील काळात मला सातत्याने सामने खेळायचे आहेत, त्याचबरोबर संघातील युवा खेळाडूंना बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळावा, यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मला विश्रांती दिली गेली, असे सरदार सिंगने सांगितले.