शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

T-20 वर्ल्ड कप, १९ मार्चला रंगणार भारत पाकिस्तान मुकाबला

By admin | Published: December 11, 2015 2:42 PM

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असून त्यांच्यात १९ मार्च रोजी धरमसाला येथे सामना रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - पुढील वर्षी ८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान भारतात रंगणा-या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असून त्यांच्यात १९ मार्च रोजी धरमसाला येथे सामना रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. आयसीसीने या संदर्भात आज सविस्तर माहिती दिली आहे. राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांशी क्रिकेट मालिका खेळतील की नाही याबाबत संभ्रम असला तरी आता वर्ल्डकपमध्ये ते एकमेकांना नक्की भिडतील हे स्पष्ट झाले आहे. 
भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी १५ मार्च रोजी नागपूरला तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ मार्च रोजी मोहाली येथे रंगणार आहे. या वर्ल्डकपमध्ये एकूण ५८ सामने होणार असून यामध्ये ३५ पुरुषांचे तर २३ महिलांचे सामने आहेत. बेंगळुरू, चेन्नई, धरमसाला, कोलकाता, मोहाली, मुंबई, दिल्ली व नागपूर येथे सामने होणार आहेत. 
नवी दिल्ली व मुंबई येथे अनुक्रमे ३० मार्च व ३१ मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून ३ एप्रिल रोजी कोलकात्यात ईडन गार्डनमध्ये अंतिम सामना होणार आहे. भारतामध्ये क्रिकेट हा धर्म असून भारताइतकं क्रिकेटवेड क्वचितच अन्य देशात बघायला मिळेल अशी टिप्पणी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या वर्ल्ड कपचे अत्यंत यशस्वीपणे आयोजन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महिलांचे सामने संपल्यानंतर पुरूषांचे सामने सुरू होणार आहेत. पुरूष वर्ल्डकपसाठी एकूण ५.६ दशलक्ष डॉलर्सची बक्षीसे आहेत तर महिलांच्या वर्ल्ड कपसाठी ४ लाख डॉलर्सची बक्षीसे आहेत.