शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

टीम इंडियाच वर्ल्डकप पटकावू शकतो

By admin | Published: March 09, 2016 5:11 AM

भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक व श्रीलंकेचा सनथ जयसूर्या यांच्यासह माजी दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेत यजमान संघ बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला. या दिग्गज कर्णधारांव्यतिरिक्त माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग आणि जोगिंदर शर्मा व २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी जेतेपदासाठी भारताला पसंती दर्शवली आहे. या दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेबाबत दिल्लीमध्ये आयोजित एक कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.सेहवागच्या मते यंदा भारताला विश्वकप पटकाविण्याची ९९ टक्के संधी आहे. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान १९ मार्च रोजी धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित लढतीबाबत बोलताना गांगुली म्हणाला, या लढतीत भारतीय संघ विजयाचा दावेदार राहील, तर काही प्रमुख खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर पाकिस्तान बाजी सरशी साधू शकतो, असे इंजमाम म्हणाला.शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मते भारतीय संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. आशिया कप स्पर्धेत विजेतेपद पटकावताना भारतीय संघाने ते सिद्ध केले आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत असून, कामगिरीतही सातत्य राखले आहे. भारतीय संघात ‘मॅच विनर’ खेळाडू असून चांगले फिनिशरही आहेत. त्यामुळे उर्वरित संघाच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत भासत आहे.’२००७ च्या विश्वकप स्पर्धेत विजयी चेंडू टाकणारा जोगिंदर शर्मा म्हणाला,‘भारतीय संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. जेतेपद पटकावण्याचा आम्हाला आत्मविश्वास होता.(वृत्तसंस्था)