शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

टीम इंडिया ‘हरा रे’

By admin | Published: June 19, 2016 4:32 AM

झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर टीम इंडियाला टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात यजमानांविरुद्ध २ धावांनी पराभव पत्करावा लागला.

हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर टीम इंडियाला टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात यजमानांविरुद्ध २ धावांनी पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा उभारल्यानंतर भारताला निर्धारित षटकात ६ बाद १६८ धावा काढता आल्या.हरारे स्पोर्टस् क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने यजमान झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. अडखळत्या सुरुवातीनंतर सातव्या क्रमांकावरील एल्टन चिगंबुरा याने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने निर्धारित षटकांत आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. एकदिवसीय मालिकेचा हीरो ठरलेला लोकेश राहुल डोनाल्ड तिरीपानोच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर मनदीप संग (३१) आणि अंबाती रायडू (१९) यांनी डाव सावरला. रायडू आणि मनदीप ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर अनुभवी मनीष पांडेने (४८) झुंजार खेळी करून भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या. त्याने ३५ चेंडंूत १ चौकार व ३ षटकारांसह खेळी सजवली. तो बाद झाल्यानंतर केदार जाधव (१९), अक्षर पटेल (१८) आक्रमणाच्या नादात बाद झाले. अखेरच्या षटकात ८ धावांची गरज असताना अक्षर बाद झाला, तर शेवटच्या चेंडूवर ४ धावांंची आवश्यकता असताना फिनिशर धोनीला (नाबाद १९) केवळ एक धाव घेता आली. चामू चिबाबा (२/१३) आणि तौराई मुझरबानी (२/३१) यांनी अचूक मारा केला.तत्पूर्वी, चिगंबुराच्या नाबाद ५४ धावांच्या जोरावर यजमानांनी आव्हानात्मक मजल मारली. त्याने २६ चेंडूंत १ चौकार आणि तब्बल ७ षटकारांचा तडाखा दिला. त्याचवेळी माल्कम वॉलर (३०), हॅमिल्टन मसाकद्झा (२५) यांनीही दमदार फटकेबाजी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने २४ धावांत २ बळी घेत झिम्बाब्वेला रोखण्याचा प्रयत्न केला, तर रिषी धवन, अक्षर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)लक्षवेधी...- झिम्बाब्वेचा भारताविरुध्द सलग दुसरा टी२० विजय आहे. या आधी १९ जुलै २०१५ रोजी झिम्बाब्वेने भारताविरुद्ध याच मैदानावर बाजी मारली.- या सामन्यात टीम इंडियाकडून ५ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केले.- सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी अखेरच्या चेंडूवर चौकार मारण्यात अपयशी ठरला- अखेरच्या षटकात रिषी धवनने २ चेंडू निर्धारित खेळल्याने सामना झिम्बाब्वेच्या बाजूने झुकला.संक्षिप्त धावफलक झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १७० धावा (एल्टन चिगुंबरा नाबाद ५४, माल्कम वॉलर ३०; जसप्रीत बुमराह २/२४) वि.वि. भारत : २० षटकांत ६ बाद १६८ धावा : (मनीष पांडे ४८, मनदीप सिंग ३८; चामू चिबाबा २/१३, तौराई मुझरबानी २/३१).