शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

...तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये

By admin | Published: June 12, 2017 6:51 PM

15 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. पण

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 12 - सुरेख गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर विराट कोहली व शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेटने धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्य फेरीत धडक मारली. 15 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. पण हा सामना न खेळता टीम इंडिया फायनलला जाण्याची शक्यता आहे. होय.. तुम्ही वाचलत ते खर आहे...कारण हवामान विभागाने बर्मिंगहॅममध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जर या सामन्यात पावसानं आपला खेळ सुरु केला आणि जर टीम इंडिया बांगलादेशचा सामना झालाच नाही तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करु शकतं. आयसीसीने सेमीफायनल सामन्यासाठी कोणताही रिझर्व दिवस ठेवण्यात आलेला नाही. तर फायनलसाठी मात्र, रिझर्व दिवस ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा : चोकर्स पुन्हा बनले जोकर!!! 

आतापर्यंत बर्मिंगहममध्ये खेळविण्यात आलेल्या प्रत्येक सामन्यात पावसाने व्यत्य आणलेला आहे. इथंच टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यात पावसानं बराच अडथळा आणला होता. जर या सामन्यातही पावसानं हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर गुणांच्या आधारावर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. 

आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!

चॅम्पियन्स ट्रॉफीतील ब गटात भारत अव्वल स्थानावर आहे. भारताने पाकिस्तान आणि आफ्रिकेचा पराभव करत चार गुण मिळवत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर अ गटात असलेल्या बांगलादेशचा एका सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना जिंकला आहे आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे बांगलादेशच्या नावावर तीन गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. बर्मिंगहॅम पावसाने खेळ सुरु केला तर भारताचा फायनलमध्ये प्रवेश पक्का आहे.

आणखी वाचा : "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन यावर्षी इंग्लंडमध्ये होत आहे. बऱ्याचशा सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही सामने रद्द करावे लागले तर काही सामने कमी षटकांचे खेळवण्यात आले. पावसाच्या खेळामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

आणखी वाचा :

सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद 

जिंकण्यासाठी तुम्हाला कटू बोलावं लागतं - विराट कोहली

सेहवागला अपशब्द वापरणा-या पाक माजी क्रिकेटपटूला मनोज तिवारीचं उत्तर