शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

टीम इंडियाने मोकळेपणाने खेळावे

By admin | Published: March 25, 2016 1:59 AM

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच

- सौरव गांगुली लिहितो़...

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच स्तब्ध झाली असेल. खेळपट्टीवर जम बसलेले दोन फलंदाज असताना तीन चेंडंूत दोन धावा काढता न येणे, हे न पटण्यासारखे आहे. दुसरा चौकार काढल्यानंतर त्यांनी केवळ एकेरी धाव काढायला हवी होती आणि धोनीने केलेल्या क्षेत्ररक्षणाची रचना पाहता ते सहज शक्य होते. त्यामुळे धावसंख्या बरोबरीत आली असती व धोनीला क्षेत्ररक्षकांना जवळ आणणे भाग पडले असते. शेवटच्या चेंडूपर्यंत हिमतीने झुंज दिल्याबद्दल भारतीय संघ, धोनी व पांड्याला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. स्पर्धेमध्ये अद्याप भारतीय फलंदाज चमक दाखवू शकलेले नाहीत, हे मात्र मान्य करायलाच हवे. भारताचे सामने जिथे झाले त्या तीनही खेळपट्ट्यांवरील फिरकी आश्चर्यजनक होती. चेंडू फिरकी घेईल, अशा खेळपट्ट्या बनवण्याच्या सूचना दिल्याचा संशय व्यक्त होत आहे, पण त्यात तथ्य नाही. कोलकाताच्या बाबतीत मी ठामपणे सांगतो, की पाऊस पडल्याने अतिरिक्त ओलाव्यामुळे चेंडू फिरकी घेऊ लागला. ग्राउंड्समननी फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या तयार करण्याच्या अतिउत्साहात कोरड्या खेळपट्ट्या तयार केल्या. त्यामुळे चेंडू इतका वळत होत असल्याचे मला वाटते. बुधवारी भारतीय फलंदाजीचा क्रम तात्पुरत्या स्वरूपाचा होता. रोहित व शिखरच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा होती, मात्र माझे मत वेगळे आहे. ते न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले होते आणि टी-२० क्रिकेटमध्ये असे होत असते. त्यांनी वृत्तपत्र वाचणे बंद करून मुक्तपणे खेळले पाहिजे. कदाचित खेळपट्टीमुळे ते मुक्तपणे खेळू शकत नसतील, पण मोहालीतील चांगल्या खेळपट्टीवर ही स्थिती बदलू शकेल. चांगल्या टणक खेळपट्ट्या फलंदाजांसाठी लाभदायक ठरू शकतील. भारताने विजय खेचून आणला, पण मला त्यांची कामगिरी फारशी प्रभावी वाटली नाही. घरच्या मैदानांवर विश्वचषक खेळणे सोपे नाही, पण काही वेळा चाहत्यांच्या अपेक्षांमुळे कामगिरी उंचावते. त्यामुळे भारताने दबावाखाली न येता खेळाचा आनंद घेतला पाहिजे. या संघात काही उत्तम फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, फक्त त्यांनी मोकळेपणाने खेळणे गरजेचे आहे. धोनीने सुरुवातीच्या फळीत फलंदाजीला यावे, असे मत मी अनेकदा व्यक्त केले आहे. तो सहाव्या क्रमांकावर येणे पसंत करतो, मात्र युवराज व रैना अद्याप चौथ्या क्रमांकावर क्षमतेनुसार खेळलेले नसल्याने कदाचित आॅस्ट्रेलियाविरुद्ध धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीतील स्वत:चे स्थान बदलावे लागेल. कारण मधल्या फळीला प्रोत्साहनाची गरज आहे आणि धोनी भविष्यात पुन्हा सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. (गेमप्लान)