शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

काहीच बदल झालेला नाही...

By admin | Published: June 04, 2017 6:02 AM

भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत गाठ पडणार आहे. बर्मिंघममध्ये आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी

- सौरभ गांगुली लिहितात...भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत गाठ पडणार आहे. बर्मिंघममध्ये आज, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वकप स्पर्धेपासून माझ्यासाठी काहीच बदललेले नसून, भारतीय संघाचे पारडे वरचढ आहे. गतविजेता भारतीय संघ मजबूत असून, लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर त्यांना पराभूत करणे कठीण आहे.सराव सामन्यात भारतीय संघ फॉर्मात असल्याचे दिसून आले. कुणी ते केवळ सराव सामने होते असे मत व्यक्त करीत भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेणार नाही, पण भारतीय गोलंदाजी फॉर्मात असल्याचे दिसून आले. सामन्यासाठी कुठल्या वेगवान गोलंदाजांची निवड करायची ही कर्णधार कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ही त्यांच्यासाठी सकारात्मक डोकेदुखी आहे. तीन वेगवान गोलंदाजांची निवड करायची झाल्यास माझी पसंती उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना राहील. जसप्रीत बुमराहमध्ये डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करण्याची क्षमता असल्यामुळे माझी त्याला पसंती आहे. टी-२० क्रिकेटमुळे त्याने डेथ ओव्हर्समध्ये मारा करण्याचे कौशल्य विकसित केले आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरते. बर्मिंघमची खेळपट्टी चांगली आहे. न्यूझीलंड-आॅस्ट्रेलिया लढतीत मोठी धावसंख्या उभारल्या गेली. इंग्लंडमध्ये अशी खेळपट्टी अपवादानेच बघायला मिळते. या खेळपट्टीवर चेंडू सिम होत नव्हता. भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे माझ्या मते भारताने रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंना संधी द्यायला हवी. खेळपट्टी कोरडी असल्यामुळे मधल्या षटकातील कामगिरीला महत्त्व राहणार आहे. भूतकाळातील लढतीच्या तुलनेत आता भारत-पाक लढतीमध्ये काय फरक आहे ? माझ्या मते यात काहीच बदल झालेला नाही. लढतीबाबत हाईप करण्यात येत असली तरी ही केवळ क्रिकेटची एक लढत आहे. गेल्या १० वर्षांत मानसिकदृष्ट्या भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत वरचढ असून, आज, रविवारीही यात बदल होणार नाही. (गेमप्लान)