शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

नागपूरच्या खेळपट्टीत काहीच चुकीचे दिसले नाही

By admin | Published: December 13, 2015 11:24 PM

आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी भारताची बाजू घेताना नागपूरच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीमध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी भारताची बाजू घेताना नागपूरच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीमध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. नागपूर कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा तीन दिवसांमध्ये पराभव केला होता. चॅपेल म्हणाले, ‘‘जगभरात वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांचे डोळे मिटून समर्थन केले जाते.’’व्हीसीए जामठाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल होती. भारताने तीन दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा १२४ धावांनी पराभव केला. आयसीसीने खेळपट्टी ‘खराब’ असल्याचे स्पष्ट करताना याबाबत बीसीसीआयकडून अहवाल मागविला होता. ‘‘चॅपेल यांनी भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी खेळपट्टीबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. शास्त्री व कोहलीने म्हटले होते, की आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काही सामने तीन दिवसांमध्ये संपतात. त्यामुळे नागपूरच्या खेळपट्टीमध्ये काही चुकीचे आहे, असे वाटत नाही.’’नागपूर व अ‍ॅडिलेड येथील खेळपट्ट्यांबाबत चर्वितचर्वण सुरू आहे. कसोटी सामने झटपट संपत आहेत, यासाठी खेळपट्टी जबाबदार आहे की खेळाडू? याबाबत बोलताना चॅपेल म्हणाले, ‘‘भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी योग्य उत्तर दिले. आयसीसी जर नागपूरच्या खेळपट्टीची चौकशी करीत असेल तर अ‍ॅडिलेडच्या खेळपट्टीची चौकशी का करीत नाही. तेथेही सामना कमी वेळेत संपला होता.’’गेल्या महिन्यात अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तीन दिवसांमध्ये पराभव केला होता. जर खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल असेल तर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीच्या तुलनेत खराब कशी ठरू शकते, असा सवाल चॅपेल यांनी उपस्थित केला आहे. चॅपेल म्हणाले, ‘‘एक चांगला फलंदाज कुठल्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करीत आणि कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असतो. त्याचा त्याला अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे. जर खेळपट्टी पहिल्या दिवशी फिरकीला अनुकूल असेल तर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीच्या तुलनेत ती खराब कशी ठरवता येईल. यामुळे चांगली खेळपट्टी कुठली, असा प्रश्न उपस्थित होतो. बॅट व बॉलमध्ये लढत अनुभवण्याची संधी देणारी खेळपट्टी चांगली असते. याचा अर्थ प्रत्येक विभागानुसार चांगली खेळपट्टी वेगवेगळी असू शकते. काही स्थळांवर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते तर काही स्थळांवर फिरकीपटूंसाठी सहायक असते.’’ चॅपेल यांनी आंतरराष्ट्रीय संघांना क्युरेटरला दोष देण्यापेक्षा खेळाडूंच्या तंत्रावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. (वृत्तसंस्था)