शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!

By admin | Published: June 05, 2017 6:21 AM

अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले. खरंतर पाकिस्तानचा संघ या लढतीत जिंकला नाही तरी भारताला कडवी टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण विराटसेनेसमोर त्यांनी सरेंडर केले. सपशेल शरणागती पत्करली. 
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आज भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी अशी लढत होईल, अशी चर्चा होती. त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीची दोनचार षटके तरी तसे वाटले. पण आधी धवन-रोहित आणि नंतर युवराज, कोहली आणि पांड्याने त्यांच्या गोलंदाजीचा पार पालापाचोळा केला.
खरंतर पावसामुळे ओलसर झालेली खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण अशी वेगवान गोलंदाजीसाठी आदर्श परिस्थिती मैदानात होती. म्हणूनच की काय, शतकी सलामी दिली तरी धवन, रोहित आणि नंतर कोहली बराच काळ दबकून खेळले. धावगतीचा काटा काही केल्या साडेपाचच्या वर जात नव्हता. अशा परिस्थितीत भारताच्या डावाला कलाटणी दिली ती युवराज सिंगने. मिळालेल्या एका जिवदानाचा पूरेपूर फायदा उठवत त्याने पाकिस्तानी गोलंदाजीवर केलेला प्रतिहल्ला भारताच्या डावाला आणि सामन्याला कलाटणी देऊन गेला. युवीच्या फटकेबाजीमुळे भांबावलेल्या पाकिस्तानला हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने पुरते दबावाखाली आणले.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग कळताना एकीकडे रिमझिम बरसणारा पाऊस आणि डकवर्थ/लुईसचे गणित यामुळे पाकिस्तानचा डाव कोलमडला. आघाडीची फळी कोसळल्यावर पाकिस्तानचे उर्वरित फलंदाज धावगतीच्या वाढत्या दबावाखाली दबून गेले. अखेर पावणे दोनशेच्या आतच त्यांचे काम तमाम झाले. आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाच्या नावावर पाकिस्तानविरुद्धच्या अजून एका संस्मरणीय विजयाची नोंद झाली. आता आपल्या पुढच्या लढतीला चार दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करूया.