शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

युवी म्हणजे टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’

By admin | Published: June 06, 2017 5:05 AM

भारताचा पाकवरील विजय अनपेक्षित नव्हे, तर वर्चस्वपूर्ण तसेच श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ठरला

व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...भारताचा पाकवरील विजय अनपेक्षित नव्हे, तर वर्चस्वपूर्ण तसेच श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ठरला. सुरुवातीला फलंदाजांनी धडाका दाखविल्यानंतर गोलंदाजांनी स्वत:चे कर्तव्य चोखपणे बजावित काम सोपे केले. पावसाने हजेरी लावल्यानंतरही भारतीय खेळाडूंची लय मात्र कायमच होती. ही आत्मविश्वासाची नांदी आहे. या स्पर्धेत आम्ही जेतेपद राखण्यासाठीच आलो आहोत, हे दाखवून देण्याचे संकेत असावेत.आघाडीच्या चारही फलंदाजांनी धावा काढल्या. मी मात्र युवराज सिंगच्या खेळीने प्रभावित झालो. तीन आठवड्यांनंतर युवीची बॅट तळपली असावी; पण या खेळीदरम्यान आपण मध्ये ‘फ्लॉप’ ठरल्याची कसर युवीने शिल्लक राखली नाही. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत युवीसारख्या खेळाडूकडून अशीच अपेक्षा आहे. त्याने मोठी फटकेबाजी करीत चाहत्यांना सुखावणारी कामगिरी केली आहे. युवी फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघ सुस्थितीत होताच, पण त्याने खेळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघाला ज्याची गरज होती ती गरज पूर्ण केली. युवीने पाकच्या माऱ्याची नाडी ओळखून जो खेळ केला, त्यामुळे मला त्याच्यातील जुना युवी पुन्हा पाहायला मिळाला. दुसरीकडे कोहलीला बॅट आणि चेंडू यामध्ये समन्वय साधण्यात थोडा त्रास जाणवत असताना युवीने दडपण झुगारून स्वमर्जीने फटकेबाजी केली. त्याने मारलेले फटके, कुठल्या क्षेत्रात फटकेबाजी करायची याचा घेतलेला वेध तसेच कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचे याचा ताळमेळ साधून युवीने धावा काढल्या. यासाठी तासन्तास नेटमध्ये घाम गाळावा लागतो. त्यानंतरच मनसोक्त फटकेबाजी करण्याचा आत्मविश्वास बळावतो आणि अधिकार प्राप्त होतो.युवराज सिंग जेव्हा स्वत:चा नैसर्गिक खेळ करतो, तेव्हा तो शिखरावर असतो. गोलंदाजांना कसे चोपायचे याबद्दल सूर गवसला की, मग तो कुठलीही हयगय न करता किंवा दयामाया न दाखविता मोठे फटके मारतो. यातून युवीचा अनुभव आणि फलंदाजीतील मुरब्बीपणा नजरेस पडतो. आयपीएलदरम्यान आम्ही दोघांनी सनरायजर्स हैदराबादसाठी बरेच डावपेच आखले. यादरम्यान मला एक बाब पाहायला मिळाली, ती म्हणजे, युवीचा सकारात्मक दृष्टिकोन! हीच मोकळीक त्याच्या स्वत:च्या खेळीत पाहायला मिळणे हे भारतीय संघाच्या यशस्वी वाटचालीचे सुंदर संकेत ठरावेत. प्रत्येक संघाला कुठल्यातरी ‘एक्स फॅक्टर’ची गरज असते. भारतीय संघाची ही गरज युवी पूर्ण करतो. भूतकाळातही आम्हाला हे जाणवले. युवीने ज्या स्पर्धेत सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिरी केली, ती स्पर्धा भारतासाठी उत्कृष्ट ठरली हे देखील अनुभवले आहे. याशिवाय माझ्या दृष्टीने नेत्रदीपक ठरलेली बाब म्हणजे अर्थात संघातील लवचिकपणा. धोनीला थांबवून हार्दिक पांड्याला अग्रक्रम देणे हा ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. हार्दिकने झटपट धावा काढायच्या कशा, हे उत्तुंग फटकेबाजीतून सिद्ध केले.भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करणारा संघ अशी ओळख निर्माण करीत आहे. तरीही सुधारणेस वाव आहे, असे जाणवले. पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होईल तेव्हा क्षेत्ररक्षणात कुठलाही गाफीलपणा परवडणारा नसेल. त्यादृष्टीने कंबर कसायला हवी. (गेमप्लान)