शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

हा विजय सांघिक : अजिंक्य रहाणे

By admin | Published: July 16, 2015 2:22 AM

अजिंक्य रहाणेने कर्णधार म्हणून पहिल्याच दौऱ्यात यशस्वी कामगिरी केली. झिम्बाब्वेला एकदिवसीय मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप देऊन रहाणेने यशस्वीपणे

हरारे : अजिंक्य रहाणेने कर्णधार म्हणून पहिल्याच दौऱ्यात यशस्वी कामगिरी केली. झिम्बाब्वेला एकदिवसीय मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप देऊन रहाणेने यशस्वीपणे कर्णधार म्हणून कामगिरी केली असली, तरी त्याने या कामगिरीचे श्रेय संपूर्ण संघाला दिले आहे.आयसीसी सांघिक मानांकन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मालिकेमध्ये संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. रहाणेने मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर सांगितले, ‘‘या यशाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. सर्व खेळाडू एकजूट होऊन खेळल्याने संघाची यशस्वी कामगिरी झाली.’’ अखेरच्या सामन्यात केदार जाधवने शतक, तर पदार्पणात अर्धशतकी खेळी करणाऱ्या मनीष पांड्ये यांचे कौतुक करताना रहाणे म्हणाला, की पांड्ये आणि केदार यांच्यातील भागीदारी महत्त्वपूर्ण होती. दोघांमध्ये जिंकण्याची भूक असल्याने आम्ही मालिका विजय मिळवला. अंबाती रायडूने पहिल्या सामन्यात शतक केले, मुरली विजयने दुसऱ्या सामन्यात आणि केदारने तिसऱ्या सामन्यात. तसेच आम्ही चांगली गोलंदाजीदेखील केली. एकूणच संघाने एकत्रितपणे यशस्वी कामगिरी केली, असेही रहाणे म्हणाला.रायडूला झालेल्या दुखापतीबाबत रहाणेने सांगितले, की रायडू दुखापतीतून सावरत असून, तो लवकरच संघात पुनरागमन करेल. तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून, त्याने मालिकेत संघासाठी मोलाचे योगदान दिले. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या केदार जाधवने सांगितले, की या शतकाचा आनंद असून, मी माझ्या कुटुंबीयांचे खूप आभार मानतो. कर्णधार आणि सपोटर्् स्टाफ यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही खेळी शक्य झाली. पांड्येने मला काही वेळ स्थिरावण्यास वेळ दिल्याने मला माझी खेळी खेळता आली, असेही केदारने सांगितले.