शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विनेशची खेलरत्नसाठी पुन्हा शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:42 IST

भारतीय कुस्ती महासंघ : साक्षी मलिकचा अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज

नवी दिल्ली : विश्व चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती विनेश फोगाटची सलग दुसऱ्या वर्षी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे तर रिओ आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केलेला आहे. साक्षी यापूर्वीच खेलरत्न पुरस्काराची मानकरी ठरली आहे.कोरोना व्हायरसमुळे स्थगित टोकियो आॅलम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला मल्ल विनेशचा गेल्या वर्षी हा पुरस्कार हुकला होता आणि सहकारी मल्ल बजरंग पुनिया या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. ती गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे आणि यादरम्यान तिने जकार्तामध्ये आशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने २०१९ मध्ये नूर सुल्तानमध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.या वर्षाच्या सुरुवातीला तिने नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. डब्ल्यूएफआयच्या सूत्राने सांगितले की, अलीकडच्या कालावधीत फॉर्मात नसलेल्या साक्षीने अर्जुन पुरस्कारासाठी आपला अर्ज पाठविला आहे.तिला २०१६ मध्ये जिम्नास्ट दीपा करमाकर व नेमबाज जितू रायसह खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. अलीकडेच ती युवा मल्ल सोनम मलिकविरुद्ध दोनदा पराभूत झाली. त्यामुळे आशियाई आॅलिम्पिक क्वालिफायरपासून तिला रोखण्यात आले होते. डब्ल्यूएफआय तिच्या नावाची शिफारस करते किंवा नाही याबाबत उत्सुकता आहे. कारण २०१९ विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता दीपक पुनिया (८६ किलो) आणि प्रतिभावान राहुल आवारे ( ६१ किलो, बिगर आॅलिम्पिक गट) यांनीही अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केले आहेत.सूत्राने सांगितले की, रिओ आॅलिम्पिकपूर्वी तिने काही विशेष केले नव्हते, त्यामुळे तिचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठविण्यात आले नव्हते, पण रिओमध्ये कांस्यपदक पटकावल्यामुळे तिला थेट खेलरत्न मिळाला. आता ती अर्जुन पुरस्कारासाठीही उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) सहायक सचिव विनोद तोमर म्हणाले,‘आम्ही सोमवारी विनेशचे नाव खेलरत्नसाठी पाठवू. ती प्रबळ दावेदार असेल, पण आम्ही अद्याप अर्जुन पुरस्काराच्या शिफारसीसाठी नावांचा विचार केलेला नाही. कारण आम्हाला जास्त अर्ज मिळालेले नाहीत. त्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्याबाबतचा निर्णय डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष घेतील. ते म्हणाले,‘आमच्याकडे नावांची शिफारस करण्यासाठी ३ जूनपर्यंतचा कालावधी आहे, पण सोमवारपर्यंत नाव पाठविले जाण्याची पूर्ण शक्यता आहे.