शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीत सूर गवसेल: कपिल

By admin | Published: May 17, 2017 7:34 PM

इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 : इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही, असा विश्वास महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी बुधवारी व्यक्त केला.कपिल म्हणाले,ह्यविराटच्या कर्तृत्वावर मला विश्वास असल्याने त्याच्या खेळावर शंका घेणे मला पटत नाही. सध्या तो चांगला खेळत नसला तरी लवकरच धावा काढेल. तो धावा काढायला लागेल तेव्हा संघातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. कर्णधार फॉर्ममध्ये असेल तर इतरांसाठी ते चैतन्यदायी ठरते.  कोहलीने मागच्या सत्रात १६ कसोटी सामन्यात ९७३ धावा केल्यानंतरआयपीएलमध्ये दहा सामन्यात केवळ ३०८ धावा ठोकल्या. चॅम्पियन्समध्ये गतविजेत्या भारताला पहिला सामना ४ जून रोजी पाकविरुद्ध खेळायचा आहे. १९८३ मध्ये विश्वचषक जिंकून देणारे कपिल पुढे म्हणाले,डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचा मारा निर्णायक ठरेल. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा हा खेळाडू इतका पुढे जाईल, असे वाटलेही नव्हते. पण तो मानसिकदृष्टया कणखर असा गोलंदाज आहे. बुमराहसारख्या युवा खेळाडूला पाहिले की याची जागा अन्य कुणी घेऊ शकेल,असे वाटत नाही. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करतात. फिरकीत अश्विन आणि रवींद्र जडेजा हे देशाचे सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे कपिल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला संघ कागदावर तरी बलाढ्य वाटतो आहे. पण माझ्यामते यंदा भारतीय संघ खरोखर भक्कम असाच आहे. महेंद्रसिंग धोनी आणि युवराजसिंग यांच्या अनुभवाचादेखील लाभ मिळणार असल्याचे कपिल यांना वाटते. या दोघांनी क्षमतेनुरूप कामगिरी करीत युवा खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करायला हवा, असे कपिल यांचे मत आहे. भारत- पाक सामन्याबद्दल ते म्हणाले,ह्यभारतीय संघ सरस असून चांगला खेळ करीत आहे. दुसरीकडे पाककडे गमविण्यासारखे काहीच नसल्याने सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. पण भारत बाजी मारेल, असे कपिल यांनी सांगितले