शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

विराटनं सोडलं शतकावर पाणी, तरीही रचला वनडे इतिहासातला मोठा रेकॉर्ड

By admin | Published: June 15, 2017 10:16 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत
बर्मिगहॅम, दि. 15 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. बांगलादेशने दिलेल्या 265 धावांचे आव्हान भारताने शिखर धवनच्या मोबदल्यात पूर्ण केले. रोहित शर्माची शतकी खेळी आणि विराटच्या कॅप्टन इनिंगमुळे भारताने बांगलादेशवर नऊ गडी राखून सहज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने नाबाद राहून शानदार शतक झळकावलं तर कर्णधार विराट कोहलीनेही नाबाद 96 धावांची खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीला शतक झळकवण्याची आणखी एक संधी होती. एकवेळ आवश्यक धावसंख्येपेक्षा भारताची धावसंख्या बरीच पुढे होती. धावांची गती कमी करून स्वतःकडे स्ट्राइक ठेवून विराट शतक झळकावूही शकत होता. मात्र, त्याने अपेक्षेप्रमाणे संघाच्या विजयाला महत्व दिलं. असं असलं तरी या सामन्यात विराटने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 8000 धावा काढण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केला आहे. 175 डावांमध्ये विराटने या विक्रमाला गवसणी घातली. यावेळी विराटने ए.बी.डिव्हिलिअर्सला मागे टाकले. डिव्हिलिअर्सने 182 डावांमध्ये 8000 धावांचा टप्पा गाठला होता. बांगलादेशविरूद्ध 88 धावा करताच त्याने हा विक्रम आपल्या नावे केला. तीन दिवसांपूर्वीच विराटने वन-डे क्रमवारीत डिव्हिलिअर्सला मागे टाकत पुन्हा एक नंबर पटकावला होता.