शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

विराट म्हणतो, इंग्लंडसोबत व्हावी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल

By admin | Published: June 13, 2017 4:44 PM

भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र

 ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅंम्पियन्स  ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत.  त्यातच भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र पाकिस्तान नव्हे तर इंग्लंडबरोबर अंतिम लढत व्हावी, असे वाटते. 
भारतीय दूतावासाकडून लॉर्डसवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला, "उपांत्य फेरीत तुमचा विरोधी संघ कोण आहे याला आम्ही फार महत्त्व देणार नाही. या स्पर्धेची साखळी फेरी आव्हानात्मक होती. आता आम्ही अंतिम फेरीपासून केवळ एक विजय दूर आहोत. तसेच 18 तारखेला भारत आणि इंग्लंड यांच्यातच अंतिम लढत व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. आता दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली तर क्रिकेटप्रेमींना ही लढत पाहायला मिळेल." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य लढतीत यजमान आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. तर  दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे. 
लॉर्डसवर भारतीय दूतावासाने टीम इंडियासाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमासाठी कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे उपस्थित होते. " भारताच्या प्रत्येक सामन्याला क्रिकेटप्रेमींची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती पाहिली की बरे वाटते. वातावरण चांगले असेल तर क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडपेक्षा चांगली जागा दुसरी असू शकत नाही. सध्या येथे चेंडू नेहमीप्रमाणे स्विंग होत नाही आहे, पण ढगाळ वातावरण असले की फलंदाजी करणे कठीण होत आहे. इंग्लंडमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो," असेही विराटने यावेळी सांगितले.