शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

वानखेडेची खेळपट्टी आपल्याला अनुकूल बनवू नका - आयसीसी

By admin | Published: March 30, 2016 1:38 PM

मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आयसीसीचे मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रमुख अँडी अॅटकीनसन यांनी वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफशी चर्चा केली आहे. कोणीही खेळपट्टी बनवताना प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर, लगेच मला कळवा असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 
 
भारताने आतापर्यंतचे चारही सामने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळले आहेत. त्यामुळे भारताने प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पण या वर्ल्डकपमध्ये वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये धावांच्या राशी उभारल्या गेल्या. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचे २३० धावांचे लक्ष्य या मैदानावर पार केले. 
 
विराट कोहलीचा अपवाद वगळता आधीच भारतीय फलंदाज फॉर्मसाठी चाचपडत आहेत. त्यामुळे फलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. उपांत्यफेरीचा सामना वानखेडेवरील दुस-या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथमच या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. 
 
भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध येथे शेवटचा सामना झाला होता. ज्या सामन्यात आफ्रिकेने ४०० पेक्षा जास्त धावा कुटल्या होत्या. भारताने हा सामना गमावल्यामुळे त्यावेळी खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता.