शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

वेस्ट इंडिज अंतिम फेरीत, भारतावर सात गडी राखून मात

By admin | Published: March 31, 2016 9:46 PM

फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धकड मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा धावांनी वेस्ट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धडक मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा वेस्ट इंडिजने सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुऴे भारताचे टी-२० वर्ल्डकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात भारताने दिलेल्या २० षटकात १९२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १९. ४ षटकात तीन बाद १९६ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी शानदार खेळी केली. लेंडल सिमन्सने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ५३ चेंडूत पाच षटकार आणि सात चौकारांची खेळी करत नाबाद ८३ धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्सने ३६ चेंडूत दोन षटकारांसह सात चौकार लगावत ५२ धावा केल्या. ख्रिस गेल हे वादळ या सामन्यात चालले नाही, ख्रिस गेलला गोलंदाज बुमराहने यार्करवर बाद केले. आंद्रे रस्सेलने ४३ आणि सॅम्युअल्सने ८ धावा केल्या.
आक्रमक फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र विराटची ही खेळी अयशस्वी ठरली. भारताकडून भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. विराटने ४७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या. त्याला रहाणे (४०) आणि धोनीने (१५) चांगली साथ दिली. तर गोलंदाज आशिष नेहरा, बुमराह आणि विराटने प्रत्येकी एक बळी टिपले.